सावंतवाडी येथे पंधरावे कवयित्री संमेलन : महाराष्ट्रासह गोव्यातील कवयित्रींचा उत्स्फूर्त सहभाग
वार्ताहर / सावंतवाडी:
‘सोसण्याचा सोस बाई सोड गं, आसवांचा पूल आता तोड गं, रोज का त्या उंबऱयाशी रंगरेषा तुझी, आभाळ रेषा ओढ गं….’ या कवितेतून कानमंत्र स्त्राrला (बाईला) मला द्यावा, असे वाटते. हा मंत्र आजच्या स्त्राrने अंमलात आणावा, असे मत गोवा येथील कवयित्री डॉ. अनुषा जोशी यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात शनिवारी झालेल्या पंधराव्या कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. जोशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आता बदलत्या काळात रात्री-पुरुष समानता आहे. यापुढे कवयित्री संमेलन म्हणण्यापेक्षा कवी संमेलन असे एकत्रित व्हायला हवे. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर, आरती मासिक व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरावे कवयित्री संमेलन झाले. संमेलनाला गोवा, महाराष्ट्र, विदर्भ या भागातून कवयित्रींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संमेलनाचे उद्घाटन कवयित्री आश्लेषा महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. आयोजक ज्येष्ठ कवयित्री उषा परब, योगिनी राऊत, फरझान इकबाल, अंजली चितळे, मनीषा अतुल, हर्षदा सुंठणकर, वृषाली विनायक व निमंत्रित कवयित्री उपस्थित होत्या. डॉ. जोशी म्हणाल्या, कवयित्री संमेलन म्हणजे स्त्राr साहित्य चळवळ आहे. ही चळवळ माझ्या माहेरी सावंतवाडीतून सुरू झाली आहे. खरेतर मी याच कवयित्री संमेलनातून घडले. कवयित्री उषा परब यांचा आधार घेत मी कवयित्री म्हणून उदयास आले. आजच्या बदलत्या काळात स्त्राr-पुरुष भेदभाव न ठेवता जगायला हवे. स्त्राrने माणूसपणाची वाटचाल करायला हवी. आजच्या स्त्राrला खऱया अर्थाने कानमंत्र द्यावा, असे मला वाटते. तिने आता तू सोसपणा सोडून तुझे आभाळ रेषा ओढ, असे वागावे.
उद्घाटक म्हणून बोलताना आश्लेषा महाजन म्हणाल्या, स्त्राr साहित्य कवयित्री संमेलन या शब्दांनी मला अचंबित केले आहे. बदलत्या काळात स्त्राr अभिव्यक्त व्हायला व्यासपीठाची गरज आहे. हे व्यासपीठ सावंतवाडी कवयित्री संमेलनाने दिले आहे. हे संमेलन म्हणजे वैयक्तिक साहित्याचा पाणवठा आहे. पूर्वीच्या स्त्रिया जात्यावर ओवी म्हणत अभिव्यक्त होत होत्या. पण आज स्त्राrला व्यासपीठ नाही. अशा कार्यक्रमाद्वारे ती व्यासपीठ शोधत आहे.
उषा परब यांना कोमसापतर्फे पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रभाकर भागवत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. वाचन मंदिरचे अध्यक्ष ऍड. दीपक नेवगी, कोमसाप सावंतवाडीचे उपाध्यक्ष ऍड. संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण, जिल्हा सदस्य भरत गावडे, विठ्ठल कदम, कल्पना बांदेकर, मेघना राऊळ, नकुल पार्सेकर, रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
निमंत्रित कवयित्री योगिनी राऊळ, मनीषा अतुल, फरझान इकबाल, अंजली चितळे, उषा परब, हर्षदा सुंठणकर, वृषाली विनायक, माधुरी जोशी, नीलम कांबळे, शालिनी मोहळे, कल्पना मलये, रसिका तेंडोलकर, शरयू आसोलकर, मंजिरी मुंडले, श्वेतल परब, कल्पना बांदेकर, स्नेहा कदम, हर्षवर्धिनी सरदार या कवयित्रींनी स्त्राrच्या व्यथा कवितेतून मांडल्या. सूत्रसंचालन माधवी शिरसाट, परिचय प्रज्ञा मातोंडकर, प्रवणी परब, मेघना राऊळ, श्वेतल परब, गौरी डिचोलकर यांनी करून दिला. तर आभार प्रतिभा चव्हाण यांनी मानले. यावेळी प्रा. अल्ताफ खान, ऍड. देवदत्त परुळेकर, सौ. परुळेकर, वीरधवल परब आदी उपस्थित होते.