बेळगाव / प्रतिनिधी
गांधीजी अंमलात आणणे सोपे आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर समजणे फारच अवघड आहे. सावरकर म्हणजे अखंड वाहणारा प्रवाह असून, जात व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले आणि मनुष्य जातीच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. ‘राष्ट्रीयत्व’ या झेंडय़ाखाली हिंदूंना एकत्रित आणण्याचे काम केले. मात्र सावरकरांचे राष्ट्रीय हिंदूत्व कोणीच समजू शकले नाहीत. अशी खंत ज्ये÷ सिने कलाकार शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर रविवारी शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जाज्वल्य इतिहासाचा जीवनपट उलगडला.
टिळकवाडी येथील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वेणुगोपाल सभागृहात व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. वीर सावरकरांनी धर्माची व्याख्या करताना धर्म म्हणजे गुणधर्म असल्याचे सांगितले आहे. मुळात मनुष्य धर्म म्हणजेच हिंदू धर्म असून, जेव्हा मनुष्य जन्माला आला तेव्हापासूनच हिंदू धर्माचाही जन्म झाल्याचे म्हटले आहे. निसर्ग नियमाप्रमाणे वागणारे सावरकर होते. त्यांनी शेवटपर्यंत विज्ञाननि÷ तत्वज्ञान बाळगले. मात्र 12 हजार पृ÷ांचा इतिहास लिहिलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना इतिहासाच्या दोन ते तीन पानापुरते मर्यादीत ठेवण्यात आले. ब्रिटीशांनी स्वाभिमान संपविण्याचे तसेच देशाचा जाज्वल्य इतिहास पुसून टाकण्याचे काम केले. आता काँग्रेसच्या वतीने कोणतेही पुरावे नसताना सावरकरांना बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे शरद पोंक्षे यांनी यावेळी सांगितले.
इंग्रजांनी संस्कृत भाषा अभ्यासातुन काढण्याचे काम केले. आणि भारतीयांना गुलाम बनविले. ब्रिटीश धार्जिणे शिक्षण संस्कृती लादल्याने स्वातंत्र्यानंतरही आपण गुलामाप्रमाणे वागत असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले. अहिंसा हा मुळातच शब्द नसून देशाचे स्वातंत्र्य रक्त न सांडता मिळाल्याची खोटी माहिती पसरविण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकरांना ‘क्रांतीकारांचा महामेरू’ असे म्हटले आहे. ब्रिटीशांना सावरकरांची प्रचंड दहशत होती. ते जन्मठेपेत अडकले नसते तर देशाला 1915 लाच स्वातंत्र्य मिळाले असते. आणि आपला देश शौर्याचा देश झाला असता. मात्र अहिंसेची लस नसा नसात टोचून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खरा इतिहास दडपून ठेवल्याचे पोंक्षे यांनी सांगितले.
वयाच्या 27 व्या वषी जन्मठेपेच्या दोन शिक्षा भोगणारा देशातील एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले. अंदमान हे स्वतंत्र भारताचे आरमाराच प्रमुख केंद्र बनावे अशी इच्छा 1910 मध्ये सावरकरांनी व्यक्त केली होती. इतका दूरदृष्टी असणाऱया स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य वीराच्या स्वप्नाची पूर्तता झाली आहे. मात्र सेल्युलर जेलमध्ये राजकीय कैदी असताना कायद्याच्या विरोधात वागणूक दिल्याबद्दल मुक्त करण्याचा अर्ज त्यानी दिला होता. मात्र सध्या याचाच गैर अर्थ काढून त्यांच्यावर पुरावे नसताना माफीवीर असा आरोप करण्यात येत आहे. डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या तोडीचे काम वीर सावरकरांनी केले आहे. रत्नागिरी येथे अस्पृष्यासाठी पतीतपावन मंदिर बांधणारा पहिला व शेवटचा ब्राम्हण स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. मात्र आज त्यांना जातीत अडकवण्याचे महापाप काहींच्या वतीने होत असल्याबद्दल शरद पोंक्षे यांनी खंत व्यक्त केली.
प्रारंभी रोटरी क्लब बेळगाव साऊथचे सहाय्यक प्रांतपाल रो. वीरधवल उपाध्ये यांनी स्वागत करून रोटरीच्या कार्याची माहिती दिली. माजी अध्यक्ष रो. चैतन्य कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. इव्हेंट चेअरमन अशोक नाईक यांनी शरद पोंक्षे यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कमल कुलकर्णी यांनी वंदे मातरम गायिले आणि त्यांच्या पसायदानाने व्याख्यान कार्यक्रमाची सांगता झाली. सावरकर प्रेमी संजय रायकर यांनी कार्यक्रम स्थळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चित्र प्रदर्शन मांडले होते. शरद पोंक्षे यांनी त्यांचे कौतुक केले. व्याख्यान कार्यक्रमास सावरकर प्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.