गेल्या आठवडय़ात हनुमान जयंतीच्या निमित्ताने चिंतन करत असताना माझ्या मनात प्रभू श्रीरामचंद्रांच्या सेवेकरिता हनुमंतांनी केलेल्या विविध सेवेचा विचार चालू असताना एक घटना प्रकर्षाने निदर्शनास आली की त्रेता युगामध्ये हनुमंतांनी एकटय़ाने रामदूत होऊन सीतेच्या शोधार्थ लंकेमध्ये प्रवेश केला होता. हा प्रसंग वाचताना मला अलीकडेच भारताच्या शूर जवानांनी पाकिस्तानच्या भूमीत जाऊन केलेला ‘एअर स्ट्राईक’ आठवला. आजकालच्या आतंकवाद्यांप्रमाणे श्रीलंकेचा राजा रावणाने पंचवटीमध्ये असताना श्रीरामाची प्रिय पत्नी सीतेचे फसवून आणि जबरदस्तीने अपहरण केले होते. रावण आपल्या दुष्ट योजनेत सफल झाला होता. त्याने सीतादेवीचे अपहरण करून समुद्रापार असलेल्या श्रीलंकेमध्ये आणून तेथे सीतेला नानाप्रकारे भय आणि प्रलोभने दाखवून आपली पत्नी बनविण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु सीतादेवीच्या पातिव्रत्यासमोर त्याचे सर्व आसुरी प्रयत्न असफल झाले. इकडे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ निघाले असता त्यांची सुग्रीवाशी भेट झाली. त्याच्या मदतीने चोहोदिशांना असंख्य वानराना सीतादेवीच्या शोधार्थ पाठविले गेले. त्यानंतर उत्तर, पूर्व आणि पश्चिम दिशेला गेलेले वानर दल हताश होऊन परतले. परंतु दक्षिण दिशेला गेलेले दल विशेष होते, त्यामध्ये वानरश्रे÷ हनुमान होते. त्यांची भगवान श्रीरामावर अतिशय नि÷ा आणि भक्ती होती. हिंदमहासागराच्या किनारी पोहोचल्यावर त्यांची भेट जटायूचा भाऊ गिरधराज संपतीशी झाली. त्याने सीतादेवीला रावणाने समुद्रापार श्रीलंकेला घेऊन गेल्याचा समाचार हनुमंताला दिला. त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, जांबवान, सुग्रीव, अंगद या सर्वानी हनुमंताची शक्ती व भक्ती जाणून समुद्रापार असलेल्या श्रीलंकेला रामदूत म्हणून पाठविण्याचे ठरले. हनुमंतानीही हृदयपूर्वक या सेवेचा स्वीकार केला.
हनुमंत एका उडीत अनेक अडचणींचा सामना करत असतानासुद्धा शेकडो मैल समुद्र पार करून श्रीलंकेत पोहोचले. आणि सर्वप्रथम सीतादेवीचा शोध घेऊ लागले. या भेटीचे रामायणामध्ये सुंदर वर्णन आहे. तिची भेट झाल्यावर हनुमंतांनी तिला प्रभू श्रीरामांची अंगठी व प्रेमपूर्ण संदेश दिला आणि जाता जाता काहीतरी पराक्रम करावा आणि रावणाला श्रीरामाच्या सेवकाची एक झलक दाखवावी म्हणून त्यांनी रावणाची अत्यंत सुंदर अशोकवाटिका उद्ध्वस्त करून टाकली. अंततः रावणाला भेटण्यासाठी हनुमंत स्वेच्छेने इंद्रजितच्या हस्ते बंदिस्त झाले आणि त्याला रावणासमोर राजसभेत हजर करण्यात आले. तेथे हनुमंतांनी त्याला धर्माची शिकवण दिली पण त्याने क्रोधाने हनुमंताच्या शेपटीला आग लावून संपूर्ण लंकेत धिंड काढून अपमानित करण्याचा आदेश दिला. परंतु हनुमंतासाखे भगवद्भक्त अशा प्रसंगातही आपल्या शक्तीद्वारे भगवंताच्या सेवेसाठी आपला क्रोध उपयोगात आणतात. संपूर्ण लंकानगरीचे ध्यानपूर्वक अवलोकन केल्यानंतर हनुमंतांनी आपल्या रूपाचा विस्तार केला आणि त्याकाळी आतंकवाद्यांचा गड असलेल्या संपूर्ण लंकानगरीला आपल्या शेपटीच्या आगीद्वारे भस्मसात केले. अंततः ते रावणाच्या महालाच्या सर्वोच्य शिखरावर चढले आणि तेथे देखील आग लावली. हवेच्या झोतामुळे आग सर्वत्र पसरू लागली आणि काही क्षणातच बघता बघता केवळ बिभिषणाचे घर सोडून हनुमंतांनी संपूर्ण लंकानगरी भस्मसात करून रावणाला स्वतःच्या तसेच प्रभू रामचंद्रांच्या भक्तीच्या शक्तीची एक छोटीशी चुणूक दाखवली. आपले कार्य संपल्यावर हनुमंतांनी समुद्रात उडी मारून आपल्या शेपटीची आग विझवली आणि सुरक्षितपणे भारतात पोहोचले.
रावणाने आणि त्यांच्या लंकेतील आतंकवादी राक्षसांनी हनुमंताद्वारे एकटय़ाने घडवून आणलेल्या ‘एअर स्ट्राईक’ची स्वप्नातदेखील कल्पना केली नव्हती. काही लोकांचा रामायणातील अशा ‘एअर स्ट्राईक’ वर विश्वास बसत नाही. त्याचा असे लोक पुरावा मागतात, रामायणकाळातील काही स्थाने इतक्मया वर्षांनंतरही आजही अस्तित्वात आहेत. अयोध्या, नंदीग्राम, गंगा नदी, त्रिवेणी संगम, चित्रकूट पर्वत, पंचवटी (नाशिक) किष्किंधा (हंपी), रामेश्वर इत्यादी रामायण ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या लीलास्थानांना आजही रामभक्त श्रद्धापूर्वक भेट देऊन या दिव्य लीलांचे आत्मशुद्धीसाठी स्मरण करतात. एवढेच काय काही दिवसापूर्वी नासा या अमेरिकन विज्ञान संस्थेने रामायण काळातील भारत ते श्रीलंका यामधील वानरांनी बांधलेला रामसेतूचा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. तेथेही रामायणाचा उल्लेख केला आहे. भारतातही अनेक महान संतांनी रामायणातील अनेक लीलासमवेत हनुमंतांनी केलेल्या या ‘एअर स्ट्राइक’ चा आपल्या साहित्यातून गौरव केला आहे. संत तुकाराम महाराजही आपल्या अभंगात याचा गौरव करताना म्हणतात हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ।।1।। तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ।।2।। करोनि उड्डाण । केले लंकेचे शोधन ।।3।। जाळिवली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ।। 4।।
अर्थात हनुमंत हा फार शक्तिशाली आहे. त्याने रावणाची दाढी जाळली. अशा हनुमंताला माझा वारंवार, निरंतर नमस्कार. त्याने समुद्रावरून उड्डाण करून लंका शोधून काढली. ज्याने रावणाची लंका जाळली तो भक्त धन्य आहे. हनुमंतांनी आपली असाधारण शक्ती, बुद्धी, सामर्थ्य आतंकवादी रावणाच्या लंकेमध्ये एकटय़ाने जाऊन नष्ट केली. त्या पाठीमागे श्री रामभक्तीची शक्ती होती आणि हनुमंताची भक्तीही होती. भगवंताचा निस्सीम भक्त श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी कसा समर्पित असावा आणि कोणत्याही संकटाची पर्वा न करता भगवंताच्या सेवेसाठी कसा तत्पर असावा याचे उदाहरण म्हणून हनुमंताच्या या लंका दहन म्हणजे आधुनिक युगातील ‘एअर स्ट्राइक’चा गौरव केला जातो. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात मलाही हा श्री रामभक्तीचा मार्ग दाखवा. हनुमंता, रामदूता मी तुम्हाला शरण आलो आहे. हे वीरा भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत ते मला दाखवा. तू शूर आणि धैर्यवान आहेस आणि स्वामींचे कार्य करण्यासाठी हात जोडून नम्रपणे त्यांच्यापुढे उभा आहेस. भगवान श्रीरामांच्या पवित्र नामजपाचा हा महिमा आहे. श्रद्धेने रामनाम जप करणाऱया भक्ताला कोणतीही गोष्ट कठीण अथवा अशक्मय वाटत नाही कारण तो जाणतो की मी जे कार्य करतो आहे ते भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आहे आणि कर्ता करविता तोच आहे, मी केवळ निमित्त मात्र आहे. पण जो स्वतःला अज्ञानाने कर्ताकरविता समजतो त्याचा अशा अद्भुत कार्यावर विश्वास बसत नाही आणि ते पुरावे मागत हिंडतात. जय श्रीराम, जय रामभक्त हनुमान.
वृंदावनदास