पणजी / प्रतिनिधी
‘’आज कोंकणी साहित्यात प्रचंड संख्येने मौलीक साहित्याची निर्मीती होत असून बालसाहित्यातही नवनवीन प्रयोग होत आहेत. लहान मुलामध्ये वाचनाची आवड निर्माण करायची असल्यास त्या त्या वयोगटासाठी आकर्षक बालसाहित्य निर्माण होणे आवष्यक आहे. हर्षा शेटये यांचे ‘ एक आशिल्ले? बायूल ’ सारखे साहित्य ही गरज पुर्ण करण्यास मदत करते“ अशे प्रसिध्द ज्ये÷ साहित्यकि दामोदर मावजो यानी आपल्या भाषणात म्हटले. बिम्ब प्रकाशनाच्या ‘ एक आशिल्ले? बायूल’ ह्या हर्षा सद्गुरू शेटये यानी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ांत ते बोलत होते. ‘’ आपले बालपण कादंबरीच्या रुपात लहान मुलासाठी लिहिणे आणि आपल्याला अलिप्त ठेवून प्रत्येक घटना तृतीय पुरुषी निवेदनात लिहिणे ही कसरत असते आणि ती लेखिकेने लिलया पेललेली असल्याचे त्यानी सांगितले. बालसाहित्याच्या पुस्तकाचे मुखपृ÷ आणि इतर चित्रंही महत्वाची असतात. चित्रकार संकेत लवंदे यानी जाणिवपुर्वक ती काढल्याने पुस्तक आकर्शक झाल्याचे त्यानी म्हटले.
गोवा राज्य वस्तुसंग्रहालयाच्या संचालक आणि प्रसिद्ध गझलकार राधा भावे यांची या सोहळय़ास खास उपस्थिती होती. लहान मुलांची कल्पनाशक्ती किती प्रचंड आणि सप्तरंगी असते याची कल्पना सदर पुस्तक सातत्याने देत राहते. त्याचमुळे आपल्याला आपले बालपण परत एकदा सदर पुस्तकातून जगता आले असे त्यानी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले. आपले मनोगत व्यक्त करताना लेखिका हर्षा शेटये यानी सदर कादंबरी लिहिण्या मागची आपली भुमिका स्पष्ट केली. प्रत्येक मुलाच्या वाटय़ाला वेगवेगळं जीवन येत असतं. त्या काळातील कित्येक घटना मनात कायमच्या घर करून असतात. त्यांच्याकडे अलिप्त राहुन पाहिल्यास ती एक चांगली साहित्यकृती बनू शकते असै आपल्याला वाटले म्हणून ही कादंबरी तयार झाल्याचे त्यानी सांगीतले.
बिम्ब मासिकाच्या उपसंपादक मानसी धाऊसकर यानी सदर पुस्तक निर्मितीच्या काळातील आपले अनुभव आणि भावना कथन केल्या. ज्ये÷ साहित्यकि आणि बिम्ब मासिकाचे मुख्यसंपादक दिलीप बोरकर यानी उपस्थिताचे स्वागत करून बालसाहित्याचे महत्व सांगितले. प्रत्येकाच्या बालपणात महत्वाच्या घटना असतात त्या साहित्यात येणे आवश्यक असल्याचे त्यानी सांगितले.