सोन्याळ/प्रतिनिधी
कोरोनाच्या वैश्विक माहामारीत देशासह जगभरात दहशत माजला आहे. कोरोना व्हायरच्या भितीने मोठा दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेसह सगळ्यांच्या जनजीवनावर झाला आहे. अशा कोविड-१९ हायरिस्क काळातही शिक्षकांच्या
सेवेसाठी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवेसाठी तत्पर असून शिक्षकांच्या विविध अडचणी आणि प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग आणि पदाधिकाऱ्याकडे सतत पाठपुरावा केला जात आहे. यातील बहुतांश प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात शिक्षक समितीला यश आले आहे अशी माहिती समितीचे नेते धरेप्पा उर्फ बाळू कट्टीमनी यांनी दिली.
शिक्षक समितीचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, किसन पाटील, शशिकांत भागवत, राजाराम सावंत, श्रीकांत माळी, युवराज कोळेकर, दयानंद मोरे,शशिकांत बजबळे, मल्लिकार्जुन बालगाव,धानाप्पा माळी,रामराव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शिक्षण सभापती आशाताई पाटील यांना वेळोवेळी भेटून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा करून मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका जिल्हा परिषदे मार्फत मिळाव्यात, एनपीएस चे फॉर्म डीसीपीएस हिशोब चिठ्या दिल्या. शिवाय भरणेची सक्ती करू नये. २००५ पुर्वीच्या अंशदान मधील शिक्षकांच्या वेतनातून वसूल करण्यात आलेल्या रक्कमा भविष्य निर्वाह निधीत जमा कराव्यात.
विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय शिक्षक रिक्त पदे पदोन्नतीने भरावीत. विषय शिक्षकांना ऐच्छिक रिव्हर्शन देण्यात यावे. यासह अनेक विषयांवर चर्चा झाली. यावर निश्चित तोडगा काढू असे आश्वासन सभापतींनी दिले. याशिवाय कन्नड माध्यमासाठी ऑनलाईन शिक्षणबाबत काही पीडीएफ आणि शैक्षणिक अँपमध्ये कन्नड विषय सामील करावा ह्यासाठी शिक्षक समितीच्यावतीने राज्य पातळीवर व जिल्हा प्रशिक्षण संस्था सांगलीकडे पाठपुरावा करण्यात आले आहे. संबंधिताकडून राज्य पातळीवर याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून कन्नड माध्यमातून ऑनलाइन शिक्षण अभ्यासक्रम व शिक्षणमाला सुरू होण्यासाठी आश्वासन मिळालयाची माहिती यावेळी दिली आहे. तसेच यावेळी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याची माहिती देऊन त्यांना कार्यमुक्त होण्यासाठी तात्काळ आदेश काढल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाचे समितीच्या वतीने आभार मानण्यात आले अशी माहिती कट्टीमनी यांनी सांगितले.