नांदोशी येथे मंडल कृषी विभागाच्यावतीने हुमणी प्रात्यक्षिक
प्रतिनिधी / औंध
हुमणी किड नष्ट करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा सर्वांगिन उपाययोजना करणे आवश्यक आहे. भुंगेरे एरंड आंबवन सापळ्याच्या वासाने आकर्षित होतात व सापळ्यात पडतात त्याच बरोबर प्रकाश सापळ्यात सुद्धा सापडतात असे भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत हे नियंत्रण उपाय सर्वात प्रभावी व कमी खर्चाचे आहेत म्हणून शेतकऱ्यांनी सापळ्यांचा उपयोग करून नियंत्रण सुरू करावे असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे यांनी केले.
औंध मंडल कृषी विभागाच्या वतीने नांदोशी ता खटाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना हुमणी किड मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळीतालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडळ कृषीअधिकारी अक्षय सावंत कृषी पर्यवेक्षक विजय वसव, सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.
हुमणीचा प्रादुर्भाव काही दिवसात होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी उपायोजना सुरु करणे गरजेचे आहे अंड्यातून बाहेर निघाल्यावर आळ्या जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करते दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील आळ्या ऊस व इतर पिकांची मुळे जून ते ऑक्टोबर महिन्यात खातात त्यामुळे पिकांचे अन्न व पाणी घेण्याचे कार्य बंद पडून संपूर्ण पीक लोळते हूमनीमुळे उसाच्या उगवणीवर 40 टक्के प्रादुर्भाव होतो. प्रादुर्भाव जास्त असल्यास शंभर टक्के नुकसान होते हुमणी किडीचा बंदोबस्त योग्य वेळी करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी योग्यवेळी उपाययोजना केली तर निश्चितच हुमणी वर नियंत्रण मिळवता येते. काही समस्या आली तर शेतकऱ्यांनी मंडल कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. मंडळकृषी अधिकारी अक्षय सावंत यांनी प्रास्ताविक केले. कृषी पर्यवेक्षक विजय वसव यांनी आभार मानले.