ऑनलाईन टीम/ तरुण भारत
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी नुकतंच एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी मनमोहन सिंग सरकारवर टीका केली आहे. याआधीही मनीष तिवारी यांनी पक्षावर टीका केली होती. आपल्या पुस्तकात मनीष तिवारी यांनी लिहिलं आहे की २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती. कोणतीही कारवाई न करणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे, असंही त्यांनी लिहिलं आहे. तसेच तिवारी यांनी या मुंबई हल्ल्याची तुलना ९/११ च्या हल्ल्याशी करत भारताने कठोर कारवाई करायला हवी होती, असं मत व्यक्त केलं होतं.
याआधीही मनीष तिवारी यांनी पक्षावर टीका केली होती. या आधी पंजाबमधल्या राजकीय अस्थिरतेवर भाष्य करत टीका केली होती, ज्यांना पंजाबची जबाबदारी दिली होती, त्यांना त्याची अजिबात जाणीव नाही. यासोबतच तिवारी यांनी कन्हैय्या कुमारच्या पक्षप्रवेशावरही प्रश्न उपस्थित केला होता.