ऑनलाईन टीम / मुंबई :
चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी केलेली नसून भारताचे कोणतेही लष्करी ठाणे काबीज केलेले नाही, असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी झालेल्या भारत चीन सीमेवर युद्धजन्य परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिला. पंतप्रधानाच्या या निवेदनात नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शहीद झालेल्या 20 जवानांबाबत सवाल केला आहे.
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, जर कोणी सीमेत घुसले नाही, कुठल्या पोस्टवर ताबा घेतला नाही, मग 20 सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची? असा सवाल पंतप्रधान मोदींना केला आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांबरोबर झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला असून भारतात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. विरोधी पक्षाकडून मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारून कोंडीत पकडले जात आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून चिनी सैन्याने घुसखोरी केली नसल्याचे सांगितले आहे.