मुंबई
शेअर बाजारात मागच्या आठवडय़ात मोठी घसरण अनुभवायला मिळाली. यात सेन्सेक्समधील आघाडीवरच्या 10 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 3.91 लाख कोटी रुपयांची घट दिसून आली आहे. यात सर्वाधिक नुकसान झालं ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे. टाटासोबत रिलायन्स इंडस्ट्रिजलाही मागच्या आठवडय़ात फटका बसला आहे. 30 समभागांचा सेन्सेक्स मागच्या आठवडय़ात 2 हजार 943 अंकांनी अर्थात 5.42 टक्के इतका घसरलेला दिसला. निफ्टीतही 908 अंकांची किंवा 5.61 टक्क्यांची घट दिसली.