नवी दिल्ली :
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये आतापर्यंत 38 हजार कोटी रुपयांची भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली असल्याचे दिसून आले आहे. जागतिक पातळीवर सकारात्मक परिस्थिती आणि देशांतर्गत आर्थिक विकासाची गती पाहता विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले होते. अलीकडच्या काळामध्ये बाजारात झालेल्या घसरणीचा फायदा गुंतवणूकदारांनी उठवून खरेदीची संधी साधली असल्याचेही पाहायला मिळाले आहे. मार्च 22 पर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी 13,223 कोटी रुपयांची डेट बाजारात गुंतवणूक केली आहे.