अहिल्या परकाळे,कोल्हापूर
Kolhapur News : तणावमुक्ती अन् श्रमपरिहारासाठी लोक सांस्कृतिक कार्यक्रमांचा आधार घेतात,त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी कलाकार वेदना लपवत कलेंतून त्यांची करमणूक करतात,पण याच कलाकारांकडे उतार वयात समाजाचे दुर्लक्ष होते.अशा ज्येंष्ठ कलाकारांना राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून मानधन दिले जाते.चार वर्षापासून या मानधनापसून ज्येष्ठ कलाकार वंचित आहेत.त्यांच्या आंदोलनानंतर समिती स्थापन झाली,तिची पहिली बैठक झाली त्यामध्ये 2019-2022 या चार वर्षासाठी 400 कलाकारांना मानधन देण्यास मंजुरी मिळाली आहे,पण त्यांच्या अर्जांची तपासणी करूनच गटनिहाय मानधन दिले जाईल. मानधनाची रक्कम तोकडी असून जगायचे कसे? असा प्रश्न कलाकारांसमोर आहे. त्यामुळे मानधनात वाढीची मागणी पुढे येत आहे.
राज्य शासनाने राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक आणि कलाकार मानधन योजना जाहीर केली.त्यानुसार मानधन दिले तरी ही रक्कम अतिशय तोकडी आहे.जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील कार्यरत साहित्यिक आणि कलाकारांचा गट ठरवला जातो.30 ते 35 वर्षे चित्रपट सृष्टीत काम केलेले असेल तर त्या कलाकारांना ए गटातून महिन्याला 3100 रूपये दिले जातात.तर बी गटातील कलाकाराला 2700 तर सी गटातील कलाकारांना 1500 मानधन दिले जाते.महागाईच्या जमाण्यात ही रक्कम अतिशय कमी आहे.ही रक्कम कधी मिळणार यासाठी शासन दरबारी फेऱ्या माराव्या लागतात.काहीवेळी या फेऱ्यांमध्येच सरकारने दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त पैसे खर्च होतात,असे ज्येष्ठ कलाकारांचे म्हणने आहे.आयुष्यभर रसिकांची करमणूक करणाऱ्या थकलेल्या कलाकारांच्या दवाखान्याचा खर्च व्हावा,इतपत मानधन सरकारने द्यावे,अशी अपेक्षा ज्येष्ठ कलाकारांकडून व्यक्त होत आहे.
रंगमंचावर पाय ठेवल्यानंतर जवळपास 30 ते 35 वर्षे वेगवेगळ्या रंग चेहऱ्यावर चढवत प्रेक्षकांची करमणूक करणारे कलाकार तरूण वयात अतिशय फेमस असतात.त्यांच्या कलाविष्कारातून त्यांनी इतरांपेक्षा आपली वेगळी ओळख निर्माण केलेली असते.कोणी हास्य-विनोद,कोणी डॅशिंग तर कोणी रडवेली भूमिका साकारलेली असते.त्यांच्या भूमिकांमधूनच कलाकार प्रेक्षकांच्या पसंदीस येत असतात.परंतू वय वाढल्यानंतर चित्रपट किंवा मालिकांमध्ये भूमिका मिळण्याचे प्रमाण नगण्य होते,तेंव्हा कलाकारांची जीवनशैलीच बदलते.ऐरवी झगमगत्या दुनियेत वावरलेले कलाकार एकाकी पडतात आणि वयाबरोबर रसिकांमधील त्यांची प्रसिध्दीही कमी होते.आयुष्यभर छोटी-मोठी कला साकारलेले सर्वजणच आयुष्यात भरमसाठ पैसा कमवतात असे नाही.ज्यांनी जेमतेम जीवन जगण्यापुरते पैसे कमवलेले असतात.ते संपल्यानंतर त्यांच्या उतार वयात आधारच तुटतो,अशावेळी शासनाने मदत करावी, शी माफक आशा ज्येष्ठ कलाकारांकडून व्यक्त होत आहे.
मानधनात वाढ करावी
तमाशा,संगीत,नाटक,लोककला,चित्रपट आदी विभागातील फक्त शंभर कलाकारांना मानधन दिले जाते.प्रत्येकवर्षी फक्त शंभर कलाकारांना मानधन देण्याची अट शासनाने घातल्याने इतर कलाकारांनी काय करायचे असा प्रश्न कलाकारांमधून उपस्थित केला जात आहे.महागाईच्या दुनियेत शासनाने दिलेल्या मानधनात ज्येष्ठ कलाकारांना साधी औषधेदेखील घेता येत नाहीत. त्यामुळे शासनाने नियमात बदल करीत ज्येष्ठ कलाकारांच्या संख्येत आणि मानधनात चांगली वाढ करावी.
सरकारच्या अटी, शर्थी चुकीच्या
कला क्षेत्रातील सर्व विभागातील फक्त शंभर ज्येष्ठ कलाकारांना मानधन देण्याची अट चुकीचे आहे.सांस्कृतिक क्षेत्रातील भरमसाठ महसूल सरकारकडून गोळा केला जातो. त्यामानाने कलाकारांना मानधन दिले जात नाही.तसेच मानधन घेणारा कलाकार मृत झाल्यानंतर त्याचा पत्नीला मानधन मिळण्यास किमान चार महिने लागतात,हा कोणता न्याय आहे. सरकारने सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांनाच समितीवर घेवून कलाकारांना चांगले मानधन द्यावे.
अर्जुन नलवडे चित्रपट लेखक, दिग्दर्शक