ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत खा. संजय राऊत यांनी यासंदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. राऊत यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
भीमा पाटस कारखाना भाजप आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यात तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाला आहे. कारखान्या व्यतिरिक्त खासगी कामांसाठी हे पैसे वापरल्याचे राऊत यांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी सीबीआयकडे केली आहे.
राऊत यांनी यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, गृहमंत्र्यांनी याकडे डोळेझाक केल्याने मला सीबीआयचे दरवाजे ठोठवावे लागले. बघू पुढे काय होते ते, असेही राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीला टॅग केलं आहे. तसेच दोन पानाचं पत्रही शेअर केलं आहे.