वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील दोन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या प्रवासानंतर आज दिल्लीसह अन्य राज्यांमधील लॉकडाऊनच्या नियमावलीत शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे गेले 55 दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असणाऱया दुकानांची शटर्स उघडण्यास आताशी सुरुवात होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच कॅटने सरकारकडून सादर करण्यात आलेल्या व्यापाऱयांच्या संदर्भातील नियमावलीवर पुनर्विचार करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.
दुकानांची दारे उघडण्यास सुरुवात झाली असून जवळपास 4.5 कोटी दुकाने उघडण्यात आली असून सोबतच त्यांची साफ सफाई व अन्य कामे व्यावसायिकांकडून केली जात आहेत. कारण सध्या विविध ठिकाणी वास्तव्यास असणाऱया कामगारांचे स्थलांतर करुन आपल्या मूळ गावी हे कामगार गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे व्यापारी संघटनांकडून सांगण्यात आले आहे.
आरोग्यविषयक नियमाचे पालन करुन सम विषम तारखांना आपली दुकाने सर्व प्रकारची वैयक्तिक काळजी घेण्यासोबत अन्य बदल स्विकारत येत्या काळात ही दुकाने सुरु राहणार असल्याचे कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडियाचे(कॅट) प्रवीण खंडेलवाल यांनी स्पष्ट केले आहे.