मुंबई
भारतीय शेअर बाजार दैनंदिन स्तरावर रोज नवे विक्रम प्रस्थापीत करतो आहे. अशातच शेअर बाजारातील एएनजी लाइफसायन्सेसच्या समभागाने मात्र गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिल्याचे दिसून आले आहे. या समभागाने 6 महिन्याच्या अवधीत 1 लाख गुंतवणूकीचे 7 लाख रुपये केले आहेत. 6 महिन्यात हा समभाग 650 टक्के वाढला आहे. 6 महिन्यापूर्वी 85.50 रुपये असणारा भाव सध्याला 642 रुपयांवर पोहचला आहे.