अग्निशामक दलाच्या यंत्रणेने तीन लाखांची मालमत्ता वाचविली
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील भिरोंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील अडवई खैरीची मळी येथील बाळासाहेब राजाराम देसाई यांच्या काजूच्या बागायतीला आग लागून जवळपास दोन लाख रुपयांची नुकसानी झाली आहे.
सदर आग दुर्घटनेत सुमारे 100 काजू कलमांची नासाडी झाली असून यामुळे मोठय़ा प्रमाणात उत्पादनाचे नुकसान झाल्याची माहिती बाळासाहेब राजाराम देसाई यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. अग्निशामक दलाच्या यंत्रणेने ताबडतोब धाव घेऊन सदर आग आटोक्मयात आणण्यात महत्त्वाचे योगदान दिले. अन्यथा मोठय़ा प्रमाणात होणाऱया नुकसानीला सामोरे जावे लागले असते असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अडवई येथील खैरीची मळी याठिकाणी मोठय़ा प्रमाणात काजू बागायत आहे. या ठिकाणी असलेल्या बाळासाहेब राजाराम देसाई यांची मोठय़ा प्रमाणात बागायत आहे. सदर बागायतीत जवळपास 300 पेक्षा जास्त काजू झाडे आहेत. मंगळवारी दुपारी सदर बागयतीला अचानकपणे आग लागण्याची माहिती समजताच बाळासाहेब देसाई व इतरांनी सदर आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न केला.मात्र आगीची तीव्रता एवढी प्रचंड प्रमाणात होती की त्यांना याकामी यश आले नाही. शेवटी अग्निशामक दलाच्या यंत्रणेला पाचारण करण्यात आले. सदर दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्मयात आणण्यात महत्त्वाचे योगदान दिले. यामुळे जवळपास तीन लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश आले. सध्यातरी सदर बागायती मधील जवळपास शंभर काजूंची झाडे आगीत भस्मसात झाली असून जवळपास दोन लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचे बाळासाहेब देसाई यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे.. अग्निशामक दलाच्या यंत्रणेच्या माध्यमातून आग आटोक्मयात आली नसते तर मोठय़ा प्रमाणात भागांमध्ये आगीचि तांडव निर्माण होण्याचा धोका होता असे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्यातरी काजू उत्पादकांना मोठय़ा प्रमाणात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर काजूचे उत्पादन घेण्यास कुणीही तयार नसल्यामुळे व बाजारपेठेत काजूचा दर प्रचंड प्रमाणात घसरल्यामुळे काजू उत्पादकांना समोर एक विचित्र स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे .अशा या विचित्र परिस्थितीत सरकारने काजू उत्पादकांना मदत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे बाळासाहेब देसाई यांनी स्पष्ट केले आहे. अन्यथा येणाऱया काळात काजू उत्पादकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर बनण्याची भीती असून तसे झाल्यास सत्तरी तालुक्मयाची आर्थिक व्यवस्था अत्यंत मोडकळीस येण्याची भीतीही बाळासाहेब देसाई यांनी व्यक्त केली आहे.
सत्तरी तालुक्मयातील काजू उत्पादकाच्या समस्या सरकारने प्राधान्याने सोडवाव्यात. आरोग्यमंत्री विश्वजीत राणेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
सत्तरी तालुक्मयातील काजू उत्पादनाच्या बाबतीत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थिती त्याचा सारासार विचार करून विचार करछन ाजू उत्पादन खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. संदर्भात गांभीर्याने लक्ष न दिल्यास येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयाची आर्थिक परिस्थिती अत्यंत मोडकळीस येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केलेली आहे. गोवा बागायतदार संस्था माध्यमातून काजू विकत घेण्यासाठी त्यांना आदेश द्याव्यात अशा प्रकारची विनंती त्यांनी केली आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुका पूर्णपणे काजू उत्पादनात अग्रेसर मानला जात आहे .या भागातील जवळपास 70 टक्के उत्पादनावर विसंबून आहेत .यंदा सुरवातीच्या काळात मोठय़ा प्रमाणात पडलेल्या पावसामुळे काजू उत्पादन पूर्णपणे बुडीत निघाले होते. त्याचप्रमाणे सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पूर्णपणे लाँकडाऊन करण्यात आल्यामुळे सत्तरी तालुक्मयातील काजू उत्पादन विकत घेण्यासाठी कोणीही तयार नाही. त्यामुळे सध्यातरी काजू उत्पादकांच्या घरांमध्ये काजूचा साठा मोठय़ा प्रमाणात भरलेला आहे. यामुळे येणाऱया काळात सदर काजुचे उत्पादन घटल्यास त्याची विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. सध्या काही काजू व्यवसाय प्रति किलो 70 रुपयांप्रमाणे विकत घेत आहेत यामुळे काजू उत्पादकांना प्रचंड प्रमाण नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात वाढत्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत .त्याचप्रमाणे वेगवेगळय़ा गावांमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या दौऱयात आल्यानंतर या संदर्भाच्या गंभीर समस्या आपल्यासमोर मांडल्या असून सरकारने अशा उत्पादकांना पूर्णपणे पाठिंबा देणे अत्यंत गरजेचे आहे.अन्यथा येणाऱया काळात काजू उत्पादकांचे अर्थव्यवस्था पूर्णपणे धोक्मयात येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. यासंदर्भात एक पोस्ट त्यांनी फेसबुक वर शेअर केली असून याच्या माध्यमातून गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या समस्या संदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केलेली आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना विश्वजित राणे यांनी सांगितले की तालुक्मयातील जनता पुर्णपणे काजू उत्पादनावर विसंबून आहेत .त्यांनी अशा कठीण परिस्थितीत सरकारने आधार देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा येणाऱया काळात सतरी तालुक्मयाची अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस येण्याची भीती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पुढे सांगितले.