प्रादुर्भाव कायम : लम्पीला रोखण्याचे पशुसंगोपनसमोर आव्हान : शेतकऱयांना वाढीव नुकसानभरपाई देण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
लम्पी या विषाणूजन्य रोगाने बहुतांश ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱयांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्हय़ात 1,33,183 जनावरांपर्यंत प्रतिबंधक लसीकरण पोहोचविण्यात आली आहे. मात्र चिंताजनक बाब म्हणजे 831 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही 7,191 जनावरे सलाईनवर आहेत. त्यामुळे लागण झालेल्या जनावरांना लम्पीतून मुक्त करण्याचे आव्हान पशुसंगोपनसमोर आहे.
तीन महिन्यांपासून जिल्हय़ात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत 12,425 जनावरांना लागण झाली आहे. समाधानकारक बाब म्हणजे 4,403 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. लम्पीला जिल्हय़ातून हद्दपार करण्यासाठी पशुसंगोपनचे प्रयत्न सुरू आहेत.
गाय-बैलांना रोगाची अधिक लागण
जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळय़ा, मेंढय़ा, घोडा, गाढव, डुक्कर, कुत्रा, मांजर आदींचा समावेश आहे. यापैकी गाय व बैलांना या रोगाची अधिक लागण झाली आहे. जिल्हय़ात 48 हजारांहून अधिक गाय, बैल आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील दूध उत्पादनावरही परिणाम झाला आहे. शिवाय बैल दगावल्याने शेती कामावर परिणाम दिसून येत आहे. रोग नियंत्रणात आणण्यासाठी आतापर्यंत 1,33,183 जनावरांना प्रतिबंधक लस दिली आहे. त्यामुळे काही भागात रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. शिवाय रोगाची तीव्रता कमी होऊन मरतुकीच्या प्रमाणात घट झाली आहे.
प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे
बेळगाव, बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्मयात लम्पीचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे या भागात लागण झालेली आणि दगावलेली जनावरे अधिक आहेत. ज्या जनावरांना लसीकरण झाले नाही. त्या जनावरांमध्ये लक्षणे दिसून येत आहेत. शिवाय रोगाची तीव्रता अधिक असल्यास मृत्यूचे संकट ओढवत आहे.
शेतकऱयांना वाढीव मदत देण्याची मागणी
लम्पीने दगावलेल्या जनावरांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. दगावलेल्या बैलासाठी 30 हजार, गायीसाठी 20 हजार आणि लहान वासरांसाठी 5 हजार रुपये मदत दिली जात आहे. त्यामुळे लम्पीने नुकसानग्रस्त शेतकऱयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र बाजारभावाचा विचार करता दिलेली रक्कम तुटपुंजी असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे वाढीव मदत द्यावी, अशी मागणीही शेतकऱयांतून होत आहे.
दूध उत्पादनावर परिणाम
लम्पीने दगावलेल्या जनावरांमध्ये दुभत्या गायींचा अधिक समावेश आहे. त्यामुळे जिल्हय़ातील दूध उत्पादनावर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱयांनादेखील फटका बसला आहे. शिवाय जनावरे दगावलेल्या शेतकऱयांसमोर देखील अडचणी वाढल्या
आहेत.
ऐन सुगी हंगामात शेतकऱयांना फटका
बटाटा, रताळी, सोयाबीन, भुईमूग काढणीबरोबर भात कापणीलाही जोर आला आहे. काढणी झालेल्या शिवारात पेरणीचे काम सुरू आहे. त्याबरोबर लवकरच रब्बी हंगामाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे शेती कामासाठी बैलांची गरज भासणार आहे. मात्र अनेक शेतकऱयांचे बैल लम्पीने दगावले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर शेती कशी करावी, असा प्रश्न पडला आहे.