प्रतिनिधी/कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केली. त्यातील केंद्र सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने 1 जुलै रोजी फेटाळून लावली. आता महाराष्ट्र सरकारच्या फेरविचार याचिकेवर सुनावणी बाकी आहे. ही सुनावणी मंगळवारी होण्याची शक्यता आहे. ज्या खंडपीठापुढे राज्य शासनाच्या फेरविचार याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्या खंडपीठातील एक न्यायाधिश निवृत्त झाल्याने मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे.