बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना बेंगळूरस्थित शहर दिवाणी कोर्टाने मानहानीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे.
शिवमोगा येथील वकिलांनी ईश्वरप्पा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी असा आरोप केला होता की, भाजप नेते ईश्वरप्पा यांनी त्यांच्याविरोधात संसदीय शब्द वापरला आहे. दरम्यान हे प्रकरण रद्द करण्यासाठी भाजप नेत्याने कोर्टात अपील केले होते. परंतु कोर्टाने मात्र अपील नाकारले आहे. तसेच कोर्टाने कोर्टाकडून मंत्री ईश्वरप्पा यांना समन्स बजावला आहे.