भिलवडी / वार्ताहर
पश्चिम महाराष्ट्राचे महापूरात मोठी हाणी झाली आहे. पूरग्रस्तांना भरीव मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडू, सरकारवर दबावही टाकू, मागील २०१९च्या महापूरात तात्काळ राज्याचे नियम बदलून केंद्राकडून व राज्याकरून मदत मिळवुन दिली, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भिलवडी ( ता. पलूस ) येथे व्यक्त केले. त्यांनी अंकलखोप, भिलवडी, औदुंबर परिसरास भेटी देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खा. संजयकाका पाटील, आ. पृथ्वीराज बाबा देशमुख, भाजपा पश्चिम महाराष्ट्र महीला आघाडी नेत्या निता केळकर जि. प. अध्यक्ष प्राजक्ता कोरे, माजी जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भिलवडी जि. प. सदस्य सुरेंद्र वाळवेकर, माजी सरपंच विजय चोपडे, भिलवडी व्यापारी संघटना अध्यक्ष रमेश पाटील आदी उपस्थित होते.