अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करणार : फक्त पाहणी नको, उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी
उदय सावंत/साटरे.
सत्तरी तालुक्मयातील चार ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. याची दखल घेऊन सरकारने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना उत्तर गोवा जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी सत्तरी तालुक्मयातील भूस्खलन भागांमध्ये संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. याचा अहवाल मुख्यमंत्र्याच्या कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर सरकारतर्फे याबाबत आवश्यक स्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
याबाबतची माहिती अशी की, पंधरा दिवसापूर्वी सत्तरी तालुक्मयातील साटरे, करमळी, झर्मे व करंझोळ आदी भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाले. यामुळे डोंगराच्या कडा कोसळून खाली आल्या. यात प्रचंड प्रमाणात जंगल संपत्तीची हानी झाली आहे तर काही ठिकाणी काजू बागायतीची नुकसानी झालेली आहे. या संदर्भाचे वार्तांकन गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत आहे.
यामुळे सरकारी यंत्रणेला जाग आली व मुख्यमंत्री कार्यालयातून दिलेल्या निर्देशानुसार आज उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्या नेतृत्वाखाली सत्तरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर, सत्तरीचे मामलेदार दशरथ गावस, संयुक्त मामलेदार संजीवनी सातार्डेकर, विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस व इतर संबंधित अधिकाऱयांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सर्वप्रथम त्यांनी साटरे याठिकाणी जाऊन भूस्खलन झालेल्या भागाची पाहणी केली. जवळपास अडीच किलोमीटर डोंगराचा भाग पूर्णपणे खाली आलेला आहे. करमळी या भागातही अशीच गंभीर परिस्थिती आहे. भूस्खलन झालेले आहे त्या संपूर्ण डोंगरावर नागरिकांच्या काजूच्या बागायती होत्या. त्या पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. याबाबतची पाहणी या पथकाने केली.
अहवाल सरकारला सादर करण्यात येणार.
मामलेदार दशरथ गावस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सरकारच्या निर्देशानुसार पाहणी करण्यात आली. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे. विभागीय कृषी कार्यालय व जलसिंचन खाते ,वनखाते यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर अहवाल जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाला सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले
मोठा पाऊस लागल्यास धोकादायक परिस्थिती.
मामलेदार दशरथ गावस यांनी सांगितले की, सध्या ज्याठिकाणी डोंगराची माती खाली आली आहे तेथे मोठा पाऊस लागल्यास पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती लोकवस्तीच्या नजीक येण्याची भीती आहे. यामुळे ताबडतोब उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. या पाहणीत मोठय़ा प्रमाणात काजू बागायतीची हानी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे विभागीय कृषी कार्यालयाच्या अहवालात एकूण काजू नुकसानीचा सविस्तरपणे माहिती प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले.
फक्त पाहणी नको कारणमीमांसा करून उपाययोजना करा
दरम्यान आज जिल्हाधिकाऱयातर्फे पाहणी करण्यात आली. या संदर्भात स्थानिकांनी फक्त पाहणी करण्याचे नाटक न करता या मागची कारणमिमांसा शोधण्याची मागणी केलेली आहे. अचानकपणे एवढय़ा प्रचंड प्रमाणात डोंगर खाली येण्याचा प्रकार धोकादायक आहे. यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने या मागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी खास समितीची नियुक्ती करून याबाबतचा अहवाल प्राप्त करून घेतल्यानंतर उपयोजना करण्यावरही लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा सत्तरी तालुक्मयातील डोंगर म्हणजे लोकवस्ती समोर मोठे संकट आहे.
जलसिंचन खात्याच्या प्रमुख अभियंता याच्याकडून पाहणी
दरम्यान जलसिंचन खात्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांनी या भागामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता प्रकाश नाईक, वाळपई सहाय्यक अभियंता शैलेश पोकळे, कनि÷ अभियंता अझीझ शहा यांची उपस्थिती होती. अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱयांना सादर करण्यात येणार असल्याचे प्रमुख अभियंता प्रमोद बदामी यांनी स्पष्ट केले.