नवी दिल्ली/प्रतिनिधी
पेगॅसस प्रकरणी विरोधकांनी राज्यसभेत बुधवारी जोरदार गोंधळा घातला. यासोबतच १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या चर्चेवरुन गोंधळ निर्माण झाला. काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर प्रमुख विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याचवेळी वेलमध्ये उतरुन निदर्शने करत असताना मार्शल्सनी महिला खासदारांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी देखील महिला खासदारांसोबत गैरवर्तन केल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली असताना शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनीही राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी काल राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यसभेत बुधवारी सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तर या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सभागृहात गोंधळ सुरु असताना वेलमध्ये उतरुन खासदार निदर्शने करताना मार्शल्सनी खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना पाचारण केले यावरून खासदार संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला असून खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना पाचारण करता ही कसली मर्दानगी आहे?, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. गोंद होतो तेंव्हा मार्शल बोलावणं ही काही नवी गोष्ट नाही. विधानसभेत आणि लोकसभेतही कमांडोज बोलावले जातात. पण जणू काही एखादी दंगल होत आहे आणि दंगल अटोक्यात येत नाही, तेव्हा सैन्याला बोलावलं जातं तसं बंदुका घेऊन सैन्य बोलावलं गेलं. भारात-पाकिस्तानच्या सीमेवरही असं सैन्य नसेल. तिथे सरळसरळ घुसखोरी होते. चीनचे लोकं घुसत आहेत. तिथे अशाप्रकारे व्यवस्था नाही आणि संसदेत खासदारांसमोर महिला कमांडोज होत्या. हा कुठला सरकारचा मर्दानगीपणा. तो नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग तो अशा महिला कमांडोज घेऊन फिरतो. काल संसदेतही आम्ही पुढे जाऊ नये म्हणून हे कमांडोज आणले. महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी आहे, असा सवाल करत राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.