ऑनलाईन टीम / भोपाळ
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर ध्वजारोहणाची जय्यत तयारी सूरु आहे. अशीच तयारी मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये सूरु असताना मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीघांचा मृत्यू झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज दि. 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाची तयारी सूरु होती.
ग्वालियरमधील ऐतिहासिक महाराजा वाडा हा महत्त्वाच्या आणि उल्लेखनीय भाग. या महाराज वाड्यावर तिरंगा उभारण्यासाठी फायर ब्रिगेडकडून हायड्रोलिक ट्रॉलीचा वापर करण्यात येत होता. यासाठी पोस्ट ऑफिसच्या इमारतीवर तिरंगा उभारण्यासाठी तीन कर्मचारी फायर ब्रिगेडच्या ट्रॉलीमध्ये बसून प्रयत्न करत होते. यावेळी नव्या वाहनाला हाताळताना चूक झाल्याने या वाहनाच्या ट्रॉलीचा एक भाग इमारतीवर कोसळला. यात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये महानगरपालिकेचा एक चौकीदार आणि अग्निशमनदलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. तर वाहनचालक गंभीररीत्या जखमी झाला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती आणि कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. तसेच जखमींच्या लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करतो’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.