सत्तरी भूमिपुत्र संघटनेची मागणी : जनजागृती बैठकांना सुरुवात
प्रतिनिधी /वाळपई
गोवा सरकारने भूमिपुत्र अधिकारीणी विधेयक मंजूर केले मात्र सदर विधेयक गोमंतकीयावर अन्याय करणारे आहे. सत्तरीतील जनतेला याचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे सत्तरीवासियांनी आता त्याचा कडाडून विरोध करण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भाच्या जनजागृती बैठकांना सुरुवात झाली असून शनिवारी सावर्डे पंचायत क्षेत्रातील करंझोळ याठिकाणी भूमिपुत्र संघटनेने बैठक आयोजित केली होती. बैठकीत विधेयकाला विरोध करण्यासाठी उभारण्यात येणाऱया आंदोलनाला सतरी भूमिपुत्र संघटनेने आपला पाठिंबा जाहीर केला.
करंझोळ येथील देवस्थानच्या प्रांगणात झालेल्या बैठकीत मोठय़ा प्रमाणात शेतकरी बांधव, जमीन मालक तसेच नागरिकांची उपस्थिती होती. बैठकीला संबोधित करण्यासाठी प्रजल साखरदांडे, विश्वेश प्रभू, हृदयनाथ शिरोडकर, भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस, गणपत झर्मेकर, बातू गावडे व इतरांची खास उपस्थिती होती.
गोवेकरांना विश्वसात घेण्याची गरज होती-प्रजद साखरदांडे.
प्रजल साखरदांडे यांनी, सदर विधेयक घातक स्वरूपाचे आहे. गोवामुक्ती नंतर पहिल्यांदाच भाजपा सरकारने गोवेकराना अपमानित केलेले आहे. यामुळे हे विधेयक तात्काळ रद्द करावे व नवीन विधेयक अंमलात आणावे, अशी मागणी त्यांनी केली.
जमीन मालकीचे विधेयक मंजूर करा–विश्वेश प्रभू
सामाजिक कार्यकर्ते विश्वेश प्रभू यांनी, सरकारने भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक बाजूला करून सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीच्या संदर्भातील विधेयक मंजूर करावे. आज सत्तरी तालुक्मयातील जमीन मालक मालकीच्या प्रश्नावरून वंचित राहिलेले आहेत. राज्य पातळीवर उभारण्यात येत असलेल्या आंदोलनला सत्तरी तालुक्मयातील जनतेचा पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
सरकारने जमीन मालकाचे हीत जाणावे–हरिश्चंद्र गावस
सत्तरी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस यांनी सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली. गेल्या अनेक वर्षापासून जमीन मालकीच्या प्रश्नासाठी सत्तरी भूमिपुत्र संघटनेना आंदोलन करत आहे मात्र विद्यमान सरकार याकडे अजिबात लक्ष देत नाही. या विधेयकामध्ये सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकीच्या प्रश्नांचा अंतर्भाव केला असता तर त्याचे आम्ही स्वागतच केले असते. मात्र सदर विधेयक सत्तरी तालुक्मयाच्या हिताचे नाही उलटर्थी यामुळे गोव्याची हानी होण्याची शक्मयता हरिचंद्र गावस यांनी व्यक्त केल
हा तर गोवेकरांवर मोठा अन्याय– बातू गावडे.
सरकारने विधेयक मंजूर करून गोवेकरावार अन्याय केलेला आहे. सदर विधेयक मंजूर करण्यापूर्वी गोवेकरांची मते जाणून घेणे अत्यंत गरजेचे होते मात्र सरकारला याची गरज भासली नाही हे खरोखरच दुर्दैवी आहे.
यावेळी हृदयनाथ शिरोडकर, गणपत झर्मेकर, राजेश सावंत व इतरांची भाषणे झाली. राज्य पातळीवर उभारण्यात येत असलेल्या आंदोलनाला भूमिपुत्र संघटनेचा उपस्थित असलेल्या भूमिपुत्रांनी हात उंचावून पूर्ण पाठिंबा देत असल्याची शपथ घेतली.