दोडामार्ग / वार्ताहर:
दोडामार्ग तालुक्यातील बरीच गावे ही दुर्गम परिसरात येतात व त्यामुळे येथील ग्रामस्थ हे एस.टी. बस वर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक गावात एसटी बसची निदान एक तरी फेरी सुरु करावी अशी मागणी वायंगणतड येथील हर्षद नाईक यांनी केली आहे. तालुक्यातील ग्रामस्थांना साटेली – भेडशी व दोडामार्ग या दोन मुख्य बाजारपेठा आहेत. वर्षभर आतुरतेने वाट पाहणारा गणपतीचा सण अवघ्या पंधरा दिवसावर आला आहे. बऱ्याय गोष्टी अनलॉक झाल्या आहेत. तसेच बाजारपेठाही खुल्या झाल्या आहेत मात्र अजूनही एस.टी बस सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे गणपती सणाची खरेदी विक्री करणे सुलभ होण्यासाठी एसटी महामंडळाने दोडामार्ग तालुक्यातील बस फेऱ्या योग्य नियोजन करून तातडीने सुरु कराव्यात. तसे बस फेऱ्याचे वेळापत्रक जाहीर करावे व सणासुदीच्या काळात ग्रामस्थांची गैरसोय टाळावी अशी मागणी श्री नाईक यांनी केली आहे.