मुंबई/प्रतिनिधी
चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी संजय राऊतांवर टीका केली होती. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही हे भाकीत करण्यासाठी मी काही उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही. तिसरी लाट येऊ शकते का नाही हे माहीत नाही. पण कोरोना फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो माझ्याशी बोलत नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला होता. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले आहे. राज्यपालांवर मी टीका केली नाही. तुम्हाला तसं वाटत असेल त आताच अटक करा, असं खुलं आव्हानच राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
दरम्यन, संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यपालांवर मी टीका केली नाही. तुम्हाला तसं वाटत असेल त आताच अटक करा असं आव्हान दिलं आहे. मी राज्यपालांवर टीका केलेली नाही. राज्यपाल आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत आणि राहतील. तुमच्या हातात असेल तर मला आता अटक करा, असं राऊत म्हणाले. राऊतांच्या दंडात ताकद आहे का? असं काही दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल होत. आता राऊत यांनी यावेळी त्यांच्या या प्रश्नावरही उत्तर दिलं आहे. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणता का? इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर आक्षेपाहार्य टीका केल्यांनतर राणेंवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर संगमेश्वर येथे राणेंना अटक करण्यात आली. यांनतर भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात झाली. त्यातच १० महिने होऊन गेले तरी विधानपरिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेऊन लवकरात लवकर १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे. पण राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीला टाळाटाळ करत असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.