बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांची मागणी
प्रतिनिधी / पणजी
मागील दोन तीन वर्षांपासून बसमालक ज्या मागण्या करत आहेत त्या अजूनही प्रलंबित असून त्याविषयी वाहतूक खाते दुर्लक्ष करीत आहे. सध्या वाहतूक खाते अकार्यक्षम झाले आहे. वाहतूक खात्यातील अधिकारी काम न करता फक्त पैसे खाण्याचे काम करत आहेत. मागील 18 महिन्यात मुख्यमंत्र्यांनी काहीच मदत केली नाही. सरकारने लवकरात लवकर प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. बसमालकांचा जो हक्क आहे तो द्यावा अशी मागणी अखिल गोवा बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या एकदिवशीय आंदोलनानंतर बोलताना केली.
दोन तीन वर्षे झाली अजूनपर्यंत बसमालकांना इंधन अनुदान, विमा, जुन्या बसेसवरील अनुदान, तिकीट दरवाढ आदी विषय आणि विशेष म्हणजे कोरोना काळात बसेस बंद असल्याने कर भरण्यास बसमालकांना अडचणींना सामोरे जावे लागले. याविषयी वाहतूक खात्याला निवेदन देण्यात आले. मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन भरपूर वेळा देण्यात आले आहे. परंतु वाहतूक खाते अकार्यक्षम झाले आहे. खात्याचा ज्याप्रमाणे कारभार होत आहे त्याप्रमाणे पाहिला तर फक्त सहा महिने हे खाते काम करते. आदेश काढण्यासाठी फक्त खाते काम करते. इतर पदाधिकारी काहीच कार्य करत नाही. भाजप सरकारही असंवेदनशील असून बसमालक या सरकारच्या अत्याचाराचे बळी ठरत आहेत. सध्या जनतेवर उपासमारीची जी पाळी आली आहे ती या सरकारमुळे आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात असे ताम्हणकर यांनी सांगितले.