ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी रात्री घडलेल्या हिंसाचारानंतर नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून हा यामुळे संपुर्ण देशातील राजकिय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावेळी झालेल्या मृत्यूला केंद्रीय मंत्री अजय मिश्रांच्या मुलगा जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले असून केंद्रीय मंत्री अजय मिश्रांच्या मुलाविरोधात गुन्हा ही दाखल झाला आहे. यावर एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आपण लखीमपूर खेरी येथे जाणार असल्याचे म्हटले आहे.
या हिंसाचारानंतर बरीच वाहने पेटवण्यात आल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. तसेच, या घटनेवरून विरोधकांनी आता मोदी व योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करणे सुरू केले आहे. काँग्रेससह अन्य पक्षांच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर प्रदेशला आपण केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने हत्या केलेल्यांच्या प्रति एकजुट दर्शवण्यासाठी जाणार आहोत. हा अक्षम्य अपराध आहे. आता आता वेळ आली आहे की, मोदी सरकारने तीन कृषी कायदे मागे घेण्याची आणि या मंत्र्यास ही हटवलं पाहिजे. असे एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.