प्रतिनिधी/लातूर
अतिवृष्टी व पूरपरिस्थतीमुळे लातूर जिह्यातील शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाही राज्यातील आघाडी सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. या सरकारला जागे करण्यासाठी माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर व भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथील छत्रपती शिवाजी चौकात जिह्यातील शेतकऱयांच्या उपस्थितीत 72 तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात जिह्यातील 127 शेतकऱयांचा सहभाग आहे. तर शिरुर अनंतपाळ तालुक्मयातील 32 गावांनी चूलबंद आंदोलन करून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला रयत प्रति÷ान, दिव्यांग आघाडी तसेच राष्ट्रीय समाज पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंदे, उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, माजी आ. शिवाजीराव पाटील-कव्हेकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे आदींची उपस्थिती होती.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर व जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात जिह्यातील शेतकऱयांचा मोठा पाठिंबा मिळत असून सकाळी सुरू झालेल्या या आंदोलनात प्रारंभी गंजगोलाईच्या जगदंबा देवीचे दर्शन घेऊन शहरातील महात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाची सुरुवात झाली. जिह्यातील भाजपा व शेतकरी मोठÎा संख्येने उपस्थित आहेत.
या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही मोठा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱयामध्ये मोठÎा प्रमाणावर आघाडी सरकारच्या विरोधात असंतोष असून या आंदोलनाच्या माध्यमातून तो व्यक्त होताना दिसत आहे. यावेळी उपस्थित शेतकऱयांनी तसेच पक्षातील पदाधिकाऱयांनी आघाडी सरकारच्या विरोधात भाषणेही केली. या आंदोलनास सहभागी होण्यासाठी शेतकरी मोठÎा प्रमाणावर पाठिंबा देत असून तीन दिवस चालणाऱया या आंदोलनाला दिवसेंदिवस मोठा पाठिंबा भेटत असल्याचे दिसून येत आहे.