साताऱयातील घटना – तिघांची प्रकृती चिंताजनक
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील मोरे कॉलनीत रात्री साडेआठच्या सुमारास दिवाळी सणानिमित्त लाईटच्या माळा लावण्याचे काम करताना वीज वितरणच्या मुख्य वाहिनीला हात लागल्याने शॉक लागून एकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याना वाचवण्यासाठी गेलेली पत्नी व दोन्ही मुले असे तिघेही गंभीररीत्या भाजून जखमी झाले आहेत. दीपावली काही दिवसांवर आली असताना घडलेल्या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिवाळी अवघ्या चार-पाच दिवसावर आली असून सर्वत्र घरांवर विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. अशीच विद्युत रोषणाई करण्याचे काम सुनील तुकाराम पवार (वय 42, रा. मोरे कॉलनी, सातारा) हे रात्री 7.30 च्या सुमारास करत होते. इमारतीच्या दुसऱया मजल्यावर लाईटच्या माळा लावत असताना त्याच्या घराजवळून वीज वितरणची मुख्य लाईन गेली आहे. या लाईनच्या तारेला सुनील यांचा हात लागला. त्यामुळे ते तारेला चिकटले.
हा प्रकार लक्षात येताच पत्नी मनिषा यानी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याही त्यांना चिकटल्या. त्यांची दोन्हीही मुले श्रवण आणि ओम हे सुद्धा आई-वडिलांच्या मदतीसाठी धावून आले असता त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये हे चौघेही गंभीररित्या भाजून जखमी झाले आहेत.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर आजुबाजूच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी कुटुंबांला तात्काळ साताऱयातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच सुनील पवार यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी मनिषा आणि मुले श्रवण, ओम यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
विद्युत रोषणाई करताना काळजी घ्या…
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिवाळी सण उत्साहात साजरी करण्यावर भर दिला जात आहे. मात्र या उत्साहासोबत काळजी घेणे त्याहून गरजेचे झाले आहे. घराच्या आसपास असणाऱया विद्यृत तारा या जीवघेण्या ठरू शकतात. त्यामुळे सर्वांनी विद्युत रोषणाई करताना काळजी घेण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.