कोल्हापूर / प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे सरकार हे संभ्रमाचे सरकार आहे. ‘संभ्रम हि संभ्रम हे’ अशा शब्दात टीका करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यामुळे उद्याचे अधिवेशन हे नागपूरला होणार नाही. अधिवेशन पुढे ढकलून अधिवेशन मुंबईला घेतले जाईल असे भविष्यवाणी सांगत महाविकास आघाडी सरकार हे अधिवेशन नागपूरला घेण्यास घाबरत आहे. टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. त्रिपुरा व नांदेडच्या घटनेच्या निषेधार्त आज जिल्हाधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते कोल्हापुरात बोलत होते.
त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्त अमरावती मध्ये लोक उस्फुर्त पणे रस्त्यावर आले.४० हजार लोकांचा मोर्चा निघतो. याची कल्पना गुप्तवार्ता विभागाला नाही. एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी बंद मध्ये उस्फुर्त पणे सहभागी झालेल्या लोकांच्यावर हल्ला करण्यात आला. उस्फुर्त पणे मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्तीच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र तुम्ही दादागिरी करायला लागला तर नागरिक शांत बसणार नाहीत. असा इशारा चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.
या दंगलीची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी. जर महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था राखायचा असेल तर दोषीवर कारवाई व्हावी अन्यथा लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय थंड बसणार नाहीत. दरम्यान याबाबतचे निवेदन आज भाजपाच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे दिले. या संपूर्ण घटनेमागे रजा अकादमीची भूमिका आहे का ? दोन समूहामध्ये दंगली होतात त्याची मुळे रजा अकादमीमध्ये सापडतात. त्यामुळे राज्याच्या गुप्तवार्ता विभागाने अभ्यास करून रजा अकादमीवर बंदी घालावी. अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
एसटी संपावर बोलताना. चंद्रकांत पाटील म्हणाले, केवळ श्रेय भाजपाला मिळत आहे म्हणून निर्णय घेत नसाल, तर भाजपचा एकही नेता चर्चेला येणार नाही. मात्र कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्यावर लवकर तोडगा निघाला पाहिजे. तुम्ही कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा. असे पाटील म्हणाले.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचेच कार्यालय फोडल्याची घटना घडली. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, दुसऱ्याच्या घरातील भांडणावर मला काही बोलायच नाही. पण अशा घटना चायला नकोत. असे पाटील म्हणाले. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर बोलताना आमदार पाटील यांनी, आमदार शिवेंद्रराजे हे आजही भाजपमध्ये आहेत. स्थानिक पातळीवर प्रत्येकाला योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार असावा. शिवेंद्रसिंहराजे आणि अतुल भोसले हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माज्याशी बोलून निर्णय घेतला आहे. असे पाटील म्हणाले.