ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत प्रेत वाहण्याचा प्रकार समोर आला होता. यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली होती. आत गंगा नदीत मृतांचा खच पडल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट इतकी भयंकर होती की उत्तर प्रदेशात कोरोना मृतांचा आकडा लपण्यासाठी कोरोना रुग्णांचे मृतदेह गंगा नदीत फेकले होते.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशभर हाहाकार माजवला होता. कोरोनने अनेकांचा जीव गेला. उत्तर प्रदेशातही या महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या या महाविनाशकारी दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तर प्रदेशातील गंगा नदी प्रेत फेकण्याचे सोपे ठिकाण बनले होते. असा दावा आता ‘गंगा : रिइमेजिंग, रिजुनिएटींग, रिकनेक्टींग’ नावाच्या पुस्तकात करण्यात आलाय. NMCG महासंचालक आणि नमामि गंगे प्रकल्प प्रमुख राजीव रंजन मिश्रा आणि IDAS अधिकारी पुष्कल उपाध्ये यांनी हे पुस्तक लिहिले आहे.