पार्किंगसंदर्भात कोणतीच कारवाई नसल्याने शहरातील समस्या जैसे थे : फेरीवाले रस्त्यावर ठाण मांडत असल्याने व्यावसायिकांच्या दुकानांसमोर अडचणी
प्रतिनिधी /बेळगाव
बाजारपेठेत पार्किंगतळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी व्यापाऱयांच्यावतीने रहदारी पोलीस खाते आणि लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली होती. याबाबत आठ दिवसांत तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महिना होत आला तरी पार्किंगसंदर्भात कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने शहरातील समस्या जैसे थे आहे.
बाजारपेठेत पार्किंगची समस्या भेडसावत असून अस्ताव्यस्तपणे पार्किंग करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अशातच फेरीवाले आणि भाजीविपेते रस्त्यावर ठाण मांडत असल्याने व्यावसायिकांच्या दुकानांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. ग्राहक आणि व्यावसायिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसतो. तसेच रस्त्यावर फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बाजारपेठेत पार्किंगतळ उपलब्ध करावे, तसेच फेरीवाल्यांसाठी फेरीवाला झोन निर्माण करण्यात यावा, अशी मागणी महापालिका, रहदारी पोलीस आणि लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी समादेवी मंदिर येथे व्यापाऱयांची बैठक आयोजित करून निवेदन सादर करण्यात आले होते.
व्यापाऱयांच्या समस्येची व रहदारी पोलीस स्थानक निर्माण करण्याच्यादृष्टीने रहदारी पोलीस, आमदार अनिल बेनके आणि महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी खंजर गल्लीतील पार्किंगची पाहणी केली होती. तसेच गणपत गल्ली, काकतीवेस आणि कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, चावी मार्केट अशा विविध परिसराचा फेरफटका मारून बाजारपेठेतील समस्यांच्या आढावा घेतला होता. दुतर्फा वाहनांच्या रांगा, रस्त्यावर फेरीवाले आणि भाजीविपेत्यांच्या गर्दीची पाहणी केली होती. पाहणी करून भाजीविपेत्यांना महात्मा फुले भाजीमार्केटमध्ये आणि नरगुंदकर भावे चौकात स्थलांतर करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी दिली होती. तसेच ही समस्या सोडविण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन आमदारांनी दिले होते. पाहणी करून महिना होत आला तरी याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. नेहमीप्रमाणेच यावेळीदेखील व्यापाऱयांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.
केवळ दोन दिवस शिस्तीचे पालन
शहरात रहदारी कोंडी आणि पार्किंगची समस्या जैसे थे आहे. रहदारी पोलीस आणि मनपा आयुक्तांनी पाहणी केलेल्या दुसऱया दिवशी येथील फेरीवाल्यांना व भाजीविपेत्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गणपत गल्लीसह बाजारपेठेतील रस्त्याशेजारी मार्किंग करण्यात आलेल्या पांढऱया पट्टय़ाच्या आतील बाजूस फेरीवाल्यांना व भाजीविपेत्यांना बसण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार केवळ दोनच दिवस या शिस्तीचे पालन करण्यात आले. त्यानंतर तिसऱया दिवसापासून शिस्तीची एwसी की तैसी करण्यात आली.
त्यामुळे शहरातील पार्किंग समस्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तेंड द्यावे लागत आहे. अधिकाऱयांनी सूचविलेला प्रस्ताव कागदावरच असून फेरीवाला झोन आणि पार्किंगतळाची पूर्तता कधी करणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींसह रहदारी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी व्यापाऱयांच्या या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.