ऑनलाईन टीम/तरुण भारत
आर्यन खानला ड्रग्जप्रकरणात अटक केल्यांनतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. मात्र ड्रग्जप्रकरणाने नंतर वेगळंच वळण घेतलं आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात वैयक्तिक मुद्यांवरून वाद सुरू झाले. मलिक दररोज समीर वानखेडेंवर आरोप करत होते. आणि समीर वानखेडे त्या आरोपांचे खंडन करत होते. दरम्यान, दोघांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि कालांतराने यात दोघांच्या कुटुंबीयांचा देखील समावेश झाला. त्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कोर्टात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. तर पान्हा एकदा ज्ञानदेव वानखेडे यांनी नव्याने नवाब मलिकांवर मानहानीचा दावा दाखल केला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाच्या आश्वासनानंतरही मंत्री नवाब मलिक हे त्यांच्या कुटुंबाची बदनामी करत आहेत, असा दावा केलाय. या वेळी याचिकेत मलिक यांनी २८ डिसेंबर २०२१, २ जानेवारी आणि ३ जानेवारी २०२२ रोजी केलेल्या तीन वक्तव्यांचा उल्लेख आहे.
दरम्यान, नवाब मलिक आर्यन खानच्या अटकेनंतर रोज पत्रकार परिषदांना संबोधित करत होते आणि ऑक्टोबर महिन्यापासून समीर वानखेडे, त्याचे वडील ज्ञानदेव आणि इतरांविरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट करत होते. ज्ञानदेव यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती माधव जामदार यांनी निरीक्षण नोंदवले होते की, मलिक हे द्वेषाने ट्वीट करत आहेत कारण त्यांच्या जावयाला वानखेडे यांनी अटक केली होती. मात्र, न्यायालयाने मलिक यांना रोखण्यास नकार दिला होता. त्या आदेशाविरोधात वानखेडे यांनी न्यायमूर्ती काथावाला आणि जाधव यांच्या खंडपीठात धाव घेतली.