बेळगाव ः / प्रतिनिधी
प्रशासनाने विकेंड कर्फ्यू मागे घेतल्यानंतर शनिवारी बाजारात काही प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. मागील दोन आठवडय़ात विकेंड कर्फ्यू काळात बाजारात शांतता पसरली होती. मात्र विकेंड कर्फ्यूचा कालावधी संपताच बाजारात खरेदीसाठी वर्दळ वाढत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतर ठिकणी नागरिकांनी गर्दी वाढली होती.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन आठवडय़ात शनिवार, रविवार विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यामुळे बाजारपेठ शांत झाली होती. दरम्यान विकेंड कर्फ्यू काळात बाजारपेठ थांबल्याने उलाढालीवरही परिणाम झाला होता. मात्र शनिवारी बाजारपेठ पूर्ववत आल्याने उलाढाल पूर्वपदावर येत आहे. शहरातील गणपत गल्ली, मारूती गल्ली, समादेवी गल्ली, खडेबाजार, किर्लेस्कर रोड, कडोलकर गल्ली, काकतीवेस रोड, शनिवार खुट आदी भागात खरेदीसाठी लगबग पहायला मिळाली.
दोन आठवडे विकेंड कर्फ्यू काळात बाजारपेठ बंद राहिल्याने व्यापारी, कष्टकऱयांना फटका बसला होता. दोन आठवडय़ात चार दिवस बाजारपेठ बंद राहिल्याने अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान पुन्हा लॉकडाऊन होणार या भीतीने काहींनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. शिवाय शासनाने विकेंड कर्फ्यू मागे घेतल्याने शनिवारी बाजारपेठ सुरळीत सुरू झाल्याचे दिसत आहे.
विकेंड कर्फ्यूबाबत संभ्रम
शासनाने विकेंड कर्फ्यू मागे घेतला असला तरी याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे शनिवारी बाजारपेठेतील काही मार्गावर नागरिकांची वर्दळ कमी असलेली पहायला मिळाली. मागील दोन आठवडय़ाप्रमाणे शनिवारी देखील विकेंड कर्फ्यू असणार असा संभ्रम काही नागरिकांमध्ये होता. त्यामुळे शनिवारी आठवडी बाजाराचा दिवस असूनही नागरिकांची गर्दी कमी होती.