ऑनलाईन टीम / कोलकाता :
केंद्र सरकारने नियोजन आयोग बरखास्त करुन नीती आयोगाची स्थापना केली असली तरी आम्ही प. बंगालमध्ये तो पुन्हा स्थापन करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या, बंगाल नसते तर देश स्वातंत्र्य झाला नसता. मला अभिमान आहे की मी बंगालची आहे. मात्र, खेद वाटतो की, आजपर्यंत आम्हाला नेताजींच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती होऊ शकली नाही. केंद्र सरकारने म्हटले होते की, जेव्हा ते सत्तेवर येतील तेव्हा ते त्यावर काम करतील पण काहीही घडलेले नाही. खरं तर आम्ही (राज्य) नेताजी बोस आणि नॉन क्लासवरील सर्व फायली प्रसिद्ध केल्या.
दरम्यान, या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नेताजींची झांकी सादर केली जाईल. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने बंगालमधील इतर स्वातंत्र्यसैनिकांचाही समावेश केला जाईल. तसेच नेताजींसारख्या राष्ट्रीय नेत्याला श्रद्धांजली अर्पण करता यावी, म्हणून 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करावी, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला केले आहे.