12 संचालकांनी उपस्थित केला प्रश्न
कंपनीने कारखाना सोडल्यानंतर चेअरमन व्हा. चेअरमन यांना संचालक मंडळांनी सर्व अधिकारी दिले होते. असे असताना याकडे दुर्लक्ष झाले. गेले 7 महिने वरकमाईची चर्चा होती असा आरोप करत आता कंपनीवर चेअरमन, व्हा. चेअरमन यांनी जबाबदारी ढकलणे कितपत योग्य ? असा प्रश्न राजीनामा दिलेल्या 12 संचालकांनी उपस्थित केला आहे.
प्रकाशराव चव्हाण, डॉ. प्रकाश शहापूरकर, सतिश पाटील, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे, दिपकराव जाधव, किरण पाटील, अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, सदानंद हत्तरकी, जयश्री पाटील, क्रांतीदेवी कुराडे यांनी सदर पत्रक प्रसिध्दीस दिली आहे. कंपनीवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा चेअरमन, व्हा. चेअरमन यांनी स्विकारले पाहिजे असे स्पष्ट केले. 8 वर्षे कंपनीने कारखाना चांगल्या पध्दतीने चालवून सर्वच घटकांचे समाधान केले आहे. एवढेच नव्हे तर 80 कोटीचा तोटा सहन करुन युनियन बँक, स्टेट बॅंकेचा संचालकांचा फास कंपनीने सोडवला आहे. असे असताना कंपनीला शिवा, शाप देणे हा कृतघ्नपणा आहे.
मुश्रीफांना भेटणार नाही, तोंडही पहाणार नाही असे चेअरमन यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत सांगितले होते. पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल येथे भेटल्याचे चेअरमन शिंदे यांनी मान्य केले आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी आजरा रेस्ट हाऊसवर या 12 संचालकांची बैठक घेतली. या बैठकीत आमची भुमिका स्पष्ट केली. कारण 8 महिने वरकमाईसाठी घालवली गेली असा आरोप केला. डिसेंबरमध्ये कारखाना सुरु करुन फायद्यात कसा येणार ? तोडणी ओढणीची यंत्रणा नाही, योग्य मेंटनन्स केला नाही त्यामुळे कारखाना सातत्याने बंद पडतो आहे. काटामारीच्या चर्चेमुळे बदनामी झाली, ऊसाचा पुरवठा कमी झाला त्याचे काय ? असा प्रश्न केला आहे.
कंपनीने तोटा सहन करुन कारखाना सोडला. पैसे भरल्यानंतर कारखाना सोडण्याचा अधिकार कंपनीचा होता असे सांगत 11 महिने कामगारांचा पगार देता आला नाही. कामगारांचे हाल होत आहेत याची जबाबदारी चेअरमन, व्हा. चेअरमन यांचीच असल्याचे सांगत या पत्रकात कंपनीला जा म्हणून सांगितले नाही असे डांबोरा पिटत आहेत. कंपनीने कारखाना सोडल्यानंतर न्यायालयात का गेला नाही ? मुळात तुम्ही ताबाच कसा घेतला ? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.