बेळगाव : शहरात विविध ठिकाणी लागलेल्या गळत्यांद्वारे पाणी वाया जाण्याचे प्रकार सुरूच आहेत. दररोज एका ठिकाणी गळती लागल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. खडेबाजार परिसरात गळतीद्वारे पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या गळतीचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे. बाजारपेठेतील विविध ठिकाणी असलेल्या क्हॉल्वद्वारे पाणी जाण्याचे प्रकार सुरूच आहेत. खडेबाजार गणपती कॉर्नरजवळील व्हॉल्वला गळती लागल्याने एक महिन्यापासून पाणी वाया जात होते. या ठिकाणी असलेल्या व्हॉल्वची दुरुस्ती चार दिवसांपूर्वी करण्यात आली. मात्र खडेबाजार परिसरात दरबार गल्लीदरम्यान जलवाहिनीला गळती लागली असून पाणी वाया जात आहे. या गळतीचे निवारण करण्यात आले नाही. अशा लहान मोठय़ा गळत्यांद्वारे पाणी वाया जात असून दुरुस्ती कधी करणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. उन्हाळय़ात पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे गळत्यांद्वारे वाया जाणाऱया पाण्याची बचत करण्यासाठी गळत्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
Previous Articleमराठा मंदिरात साडी प्रदर्शनाला प्रारंभ
Next Article मध्यवर्ती बसस्थानकात धुळीचे साम्राज्य
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.