पॅसेंजर सुरू करण्याची केली मागणी : खासदारांनी मांडल्या प्रवाशांच्या समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
दोन वर्षे उलटली तरी अद्याप मिरज ते हुबळी या दरम्यान पॅसेंजर रेल्वे सुरू नाहीत. पॅसेंजर बंद असल्याने सर्वसामान्य प्रवासी आर्थिकदृष्टय़ा भरडला जात आहे. इतर विभागात पॅसेंजर सुरू झाल्या असताना केवळ मिरज ते बेळगाव या मार्गावरच पॅसेंजर सुरू नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे. नैर्त्रुत्य रेल्वे, मध्य रेल्वेच्या वरि÷ अधिकाऱयांकडे मागणी करूनही अद्याप पॅसेंजर रेल्वे सुरू झालेली नाही. त्यामुळे आता खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडेच प्रवाशांचे गाऱहाणे मांडत पॅसेंजर सुरू करण्याची मागणी खासदारांनी केली आहे.
लॉकडाऊनपूर्वी मिरज ते हुबळी दरम्यान अनेक पॅसेंजर धावत होत्या. यातील काही लोंढा तर काही कॅसलरॉकपर्यंत होत्या. यामुळे अत्यंत कमी खर्चात सर्वसामान्य प्रवासी प्रवास करीत होते. परंतु पहिल्या लॉकडाऊनपासून पॅसेंजर रेल्वे बंद करण्यात आल्या. वर्षभराच्या कालावधीनंतर बेळगाव ते शेडबाळ या दरम्यान एक पॅसेंजर सुरू करण्यात आली. परंतु त्या पॅसेंजरला अद्याप एक्स्प्रेसचाच दर्जा असल्याने तिकिटाला अधिक खर्च करत प्रवास केला जात आहे. तसेच या पॅसेंजरची वेळही नोकरदारांना सोयीची नसल्याने नागरिकांना बसचा प्रवास करावा लागत आहे.
बेळगावच्या शेजारीच असणाऱया हुबळी येथून अनेक पॅसेंजर धावत आहेत. तर मिरज ते पुणे या मार्गावरही पॅसेंजर आहेत. मग बेळगाव परिसरातच पॅसेंजर बंद का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. खासदार मंगला अंगडी यांना अनेकवेळा प्रवाशांनी निवेदन देऊन पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली.
रेल्वेस्थानकाच्या उद्घाटनाचेही आमंत्रण
बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसात रेल्वेस्थानकाचे उद्घाटन केले जाणार आहे. देशातील एक अत्याधुनिक रेल्वेस्थानक नैर्त्रुत्य रेल्वेने केले आहे. या रेल्वेस्थानकाच्या उद्घाटनाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना आमंत्रण देण्यात आले आहे. खासदार मंगला अंगडी यांनी त्यांची भेट घेऊन आमंत्रण दिले आहे.