प्रतिनिधी/ मेढा
जावली सह सातारा जिल्हात पक्ष वाढीसाठी पुर्ण ताकदीने प्रयत्न करणार असून येणारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांत यश मिळवून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधीत ठेवू असे आवाहन आ. शशिकांतजी शिंदे यांनी केले.
गांजे ता. जावली येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, अमित कदम, ऋषिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकायांच्या उपस्थितीत पार पडले. तसेच यावेळी युवक मेळाव्याचे आयोजन देखील राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमासाठी वेण्णा दक्षिण भागातील लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणाया विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यात गांजे गावातून घरातघर कडे जाणारा रस्ता, सम्राटनगर व लिगाडेवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. तसेच यावेळी युवक मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी वेण्णा दक्षिण भागातील सर्व गावातील लोक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी झालेल्या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांनी बोलताना पक्षवाढीसाठी जावलीसह सातारा जिह्यात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच जावळीचा विकास करणार व जावलीसाठी जास्तीत जास्त वेळ देणार असल्याचे देखील यावेळी आमदार शिंदे यांनी सांगितले. विरोधकांवर टीका करताना विरोधात काम करून सुद्धा राष्ट्रवादीत असल्याचे काही लोक भासवतात. तसेच कोणी कोणाच्या नावावर कर्ज काढले तो इतिहास सांगण्याची गरज नाही असा टोला देखील लगावला. भविष्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वजण एकत्रितपणे जावलीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी आमदार शिंदे यांनी दिले.
माजी आमदार सदाभाऊ सपकाळ व माजी शिक्षण सभापती अमितदादा कदम यांनी बोलताना जावलीला आमदार शशिकांत शिंदे साहेबांची पुन्हा गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच शिंदे साहेबांनी पुन्हा जावलीत यावे. जावलीत आल्यावर शशिकांत शिंदे यांचा विजय निश्चित आहे. तसेच प्रतापगड कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांनी कारखाना लवकरात लवकर सुरू करून शेतकयांचा उसाचा प्रश्न सोडवावा असे मत दोघांनीही व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमासाठी ऋषीकांत शिंदे ,सभापती जयश्रीताई गिरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव , बुवाबाहेब पिसाळ , आनंदराव जूनघरे, प्रदीप शिंदे, विठ्ठल पवार, भरत सपकाळ, गोपाळ बेलोशे विठ्ठलराव देशमुख,सुनील देशमुख, साधू चिकणे ,राम कदम, बाळासाहेब देशमुख, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.