ऑनलाईन टीम/तरुण भारत
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri) यांचा काश्मिर पंडितांवर आधारित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटाची देशात उलट-सुलट चर्चाच झाली. अगदी बॉलिवूडमधील सेलिब्रेटी ते देशातील वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींनी या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण आजही काही लोक असे आहेत ज्यांनी हा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. ज्यात प्रसिद्ध गायक सोनू निगमचाही (sonu nigam) समावेश आहे. पण नुकतीच यावर सोनू निगमनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं हा चित्रपट न पाहण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहिला नाही. या यादीत बॉलिवूडचा गायक सोनू निगम याचे देखील नाव आहे. सोनू निगमने एका मुलाखतीमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ न पाहण्याचे कारण सांगून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी चित्रपटासंदर्भातील केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू निगम म्हणाला, ‘मी जेव्हा अशाप्रकारच्या कथा ऐकतो तेव्हा मनातून रडत असतो. ही फक्त काश्मीरचीच गोष्ट नाहीये. मी अशाप्रकारच्या सर्वच अपराधांप्रती संवेदनशील आहे. त्यामुळेच हा चित्रपट पाहण्याची माझी हिंमत झाली नाही. ही संवेदनशीलता फक्त काश्मिरी पंडितांबद्दल नाहीये तर त्या प्रत्येक समजाबद्दल आहे. ज्यांनी अशाप्रकारच्या हिंसाचाराचा सामना केला आहे.’
केजरीवालांच्या विधानावर काय म्हणाला सोनू?
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, ‘हा चित्रपट फेक आहे आणि हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्यापेक्षा विवेक अग्निहोत्री यांना तो यूट्यूबवर टाकण्यास सांगावे. त्यामुळे तो सगळ्यांसाठी फ्री होईल आणि त्याला सर्व जण पाहू शकतील.’ याबाबत सोनू निगम म्हणाला की, टकेजरीवालांची ही प्रतिक्रिया सर्व पंडित कुटुंबियांचा अपमान आहे.’