तरुणभारत ऑनलाइन टीम
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा हा त्याच्या हटके चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या तो वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने विमल पान मसालाची जाहिरात केली होती. या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार असे तिघेही आहेत. त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात येत होतं. अखेर अक्षयने या एक पोस्ट शेअर करत सर्वांची माफी मागितली आहे.
“मला माफ करा. मी माझ्या सर्व चाहत्यांची आणि हितचिंतकांची तसेच तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसात तुमच्या विविध प्रतिक्रिया मी वाचल्या. त्याचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे. मी याआधी कधीही तंबाखू यांसह इतर उत्पादनाचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही.”“विमल पान मसालाच्या जाहिरातीत झळकल्यानंतर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांचा आणि तुमच्या भावनांचा मी मनापासून आदर करतो. म्हणूनच मी मोठ्या विनम्रपणे यातून माघार घेत आहे. तसेच मी ठरवले आहे की, या जाहिरातीतून मला मिळालेल्या पैशाचा मी चांगल्या कामासाठी वापर करेन.”“तसेच विमल पान मसाला या ब्रँडने जोपर्यंत या कराराचा कायदेशीर कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही जाहिरात प्रसारित करु शकते. पण मी वचन देतो की यापुढे भविष्यात मी फार हुशारीने पर्यायाची निवड करेन. तसेच तुम्ही नेहमी माझ्यावर असेच प्रेम आणि प्रार्थना करत राहा”,अशी भली मोठी पोस्ट अक्षयने सोशल मीडियावर शेअर केली आहे.