जोरदार वारे आणि वीजेच्या गडगडाटासह पाऊस : आमोणेत घरावर झाड पडून एक जखमी : बांबोळी येथे उपचारार्थ दाखल : आंबा पिकाची नासधूस
डिचोली / प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयाला काल गुरू. दि. 28 रोजी रात्री आठच्या सुमारास अचानकपणे सुरू झालेल्या जोरदार पावसाने अक्षरशः काही काळासाठी झोडपून काढले. सदर पाऊस मोठा व बराच वेळ पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे असह्य उकाडय़ाने त्रासलेल्या लोकांना दिलासा मिळाला. आमोणा येथे एका घरावर झाड पडल्याने घरातील एकजण जखमी होण्याची घटना घडली. तर पाऊस व वाऱयामुळे आंबा व इतर पिकांची नासधूस झाली.
सोमवारी डिचोली तालुक्मयासह राज्यातील इतरही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. या पावसातही जोरदार वाऱयामुळे विविध ठिकाणी झाडांची पडझड झाली होती. त्यानंतर काल गुरू. दि. 28 रोजी रात्री आठ वा. च्या सुमारास पावसाने अचानकपणे हजेरी लावली. वारे व वीजेचा लखलखाट नसल्याने पावसाचा कोणताही अंदाज नव्हता. परंतु अचानक सुरू झालेल्या पावसाने रौद्ररूप धारण करीत सुमारे पाऊणतास जोरदारपणे बरसखत केली. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. डिचोली बाजारात आलेले लोक बाजारातच अडकून पडले. पावसाचा जोर मोठा असल्याने तसेच वीजेचा लखलखाट आणि गडगडाट सुरू असल्याने कोणीही बाहेर पडण्याचे धाडस केले नाही.
आमोणेत घरावर झाड पडून एकजण जखमी, दुचाकीची नासधूस
भंडारवाडा आमोणा डिचोली येथे एका घरावर झाड पडल्याने सदर घरातील प्रदीप नाईक हा इसम जखमी झाला. तर एक जीए 04 एम 0481 या स्कुटी दुचाकीची नासधूस झाली. सदर घटना रात्री 8.30 वा. घडली. जखमी प्रदीप नाईक यांना सर्वप्रथम साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठविण्यात आले. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन लागलीच बचावकार्याला प्रारंभ केला आणि घरावरील झाड हटविण्याचे काम केले.
रस्त्यावरही झाडे पडल्याने वाहतूकीला अडथळा
डिचोली तालुक्मयातील मुळगाव, शिरगाव व अडवलपाल येथेही रस्त्यावर झाडे पडल्याने या भागातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सदर ठिकाणीही डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी जाऊन रात्री झाडे हटविण्याचे काम केले. दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिकारी मुकूंद गवंडी, साईनाथ केसरकर, विठ्ठल गाड, गौरीश मांदेकर, हर्षद सावंत, साईनाथ सावंत, सुरज कुंकळकर, सुभाष माजिक, सुनील गावस, रामचंद्र एकावडे, प्रवीण गावकर या जवानांनी बचावकार्यात सहभाग घेतला.
आंबा व इतर पिकांचे अतोनात नुकसान.
यावषी पाऊस व खराब हवामानामुळे अगोदरच राज्यातील काजू, आंबा व इतर उन्हाळी मोसमी पिकांवय संक्रांत आली होती. यावषी काजू व आंबा पाक कमीच असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. सध्या काजूचा मोसत तसा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. पण या आठवडय़ात दोनवेळा जोरदार वाऱयासह पडलेल्या पावसाने आंबा, भातशेती, मिरची व इतर सर्व उन्हाळी पिकांची नासाडी झाली आहे. वाऱयामुळे सर्वच ठिकाणी आंबे, कैऱया झडून पडल्याने आंब्याच्या पिकाची नासधूस झाली आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांनी बरीच नुकसानी सहन करावी लागणार आहे.