अनेक गावात वीजपुरवठा खंडित : पाणीपुरवठय़यावर परिणाम होण्याची शक्यता
प्रतिनिधी / वाळपई
गुरुवारी रात्री सत्तरी तालुक्मयात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडले असून अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांसमोर समस्या निर्माण झाली आहे.
गुरुवारी रात्री सत्तरी तालुक्मया झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी नैसर्गिक पडझड झाली असून यामुळे नुकसानीचा अंदाज प्राप्त झालेला नाही. मात्र अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला.
वाळपई -ठाणे कोपार्डे येथे रस्त्यावर झाड पडल्यामुळे जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशामक दलाच्या यंत्रणेचे ताबडतोब धाव घेऊन झाड हटवून रस्ता मोकळा करण्यास महत्त्वाचे योगदान दिले. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक बहुतांश गाव काळोखात सापडले असून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्वपदावर आलेला नव्हता. यासंदर्भात वीज खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता भागातून विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे वीज खंडित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्वपदावर येण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दाबोस पाणी प्रकल्पाची यंत्रणा बंद झालेली आहे. यामुळे शुक्रवारी दिवसभर पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्मयता आहे. तसे झाल्यास अनेक गावांमध्ये जलसंकट निर्माण होण्याची भीती आहे. काही ठिकाणी पावसामुळे पडझडच्या घटनाही घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.