कोलकाता
चहा उद्योगामध्ये विविध संघटीत कंपन्या उतरण्यासाठी उत्सुक असून भारतामध्ये विशेषतः युवकांमध्ये सुगंधी चहाची बाजारपेठ मात्र तेजीत आहे, अशी माहिती चहा मंडळाने दिली आहे.
यामध्ये म्हटले आहे, की प्रभावी हर्बल चहाची मागणी विशेष रुपात कोविडच्या सुरुवातीनंतर देशात वाढत गेली. कारण मसाला आणि प्राकृतिक संबंधी वेगवेगळय़ा आयुर्वेदीक वनस्पतीसहचा चहा हा विषाणूच्या विरोधात लढण्यास मदत करणारा असल्याच्या भावनेतून या चहाची मागणी वाढली. चहा बाजाराची उलाढाल 3,600 कोटी रुपयांची आहे.
चहा क्षेत्रात काही स्टार्टअप कंपन्याही उतरत आहेत. मसाल्यासह हर्बल व इतर आरोग्यदायी प्रकारातील चहाला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे. यातून आता कंपन्या आपली चहा विक्री केंद्रे विविध शहरात सुरू करत आहेत.