प्रतिनिधी/ अथणी
गेल्या दोन दिवसात झालेल्या वादळी वाऱयाने तालुक्मयातील नंदगाव येथील सरकारी प्राथमिक कन्नड शाळेची कौले आणि पत्रे उडून गेल्याची घटना घडली. दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने व अधिक वारे असल्याने शाळेचे छत तसेच पसिरातील अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. शाळेवरील कौले व पत्रे उडून गेल्याने शाळेच्या 10 खोल्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे 353 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचण झाली आहे. शाळा इमारतीची दुरुस्ती करुन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.