ऑनलाईन टिम नाशिक
हनुमान जन्मस्थाळावरून चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिक येथे सुरु असलेल्या शास्रार्थ सभेत आज मानापमानाचे नाट्य संपते न संपते तोच असतानाच या सभेतील महंत एकमेकांवर हमरीतुमरीवर आल्याने एकच गोंधळ झाला.
कर्नाटक येथिल किष्किंधा मठाधिपती महंत गोविंददास यांनी किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा वादा केला होता, त्याचवेळी नाशिकच्या महंतांनी अंजनेरी हेच जन्मस्थळ असल्याचा दावा केला होता. हा वाद मिटवण्यासाठी शास्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पण या सभेत सुरवातीपासूनच नाराजी नाट्य सुरू होते. पण त्याचे पुनर्वसन एकमेकांवर धावून जाण्यावर झाले. महंत गोविंद आणि इतर याच्यामध्ये वाद चालू असताना वाद विकोपाला गेला. त्यावेऴी एका महंताने महंत गोविंद यांच्यावर माईक उगारला. या घटनेने संतप्त झालेले महंत गोविंद यांनी या सभेचा त्याग केला.