प्रतिनिधी /पेडणे
15 ऑगस्ट रोजी मोपा विमानतळावर उड्डाण करण्याचे स्वप्न पाहणाऱया मुख्यमंत्र्याने अगोदर पीडित शेतकऱयांना आणि स्थानिकांना अगोदर न्याय मिळवून द्यावा व ज्याच्या जमिनी गेल्या त्यांना योग्य तो मोबदला मिळवून द्यावा , तसेच पेडणेतील युवकांची मुख्यमंत्री डा?.प्रमोद सावंत यांनी दिशाभूल करु नये असे आवाहन पेडणे येथे आयोजित केलेल्या मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडीत जनसंघटनेने आयोजित केलेल्या पञकार परिषदेत केले.
पेडणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष भरत बागकर , सचिव बया वरक, भास्कर नारुलकर , उदय महाले, उपेंद्र नाईक, पुंडालिक महाले , संजय आरोसकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री मोपा प्रकल्पा बाबत आणि नोकऱया संदर्भात करीत असलेली विधाने पूर्णपणे चुकीच्या माहितीवर आधारित असून त्यांनी पेडणेकर यांची दिशाभूल करू नये. एका वेळा ते 100 टक्के नोकऱया या पेडणेकरांना देण्यात येतील असे सांगतात. त्या दिल्याही म्हणून ते सांगतात नंतर लगेच काही दिवसाने 85ज्ञ् टक्के नोकऱया ह्या पेडणेकरांना दिल्या असे सांगतात. यावरून मुख्यमंत्री डा?. प्रमोद सावंत यांना विमानतळ कंपनीचे अधिकारी तसेच मोपा विमानतळ प्राधिकरणचे संचालक चुकीची माहिती देत असल्याचा आरोप यावेळी भरत भागकर यांनी केला.
ते पुढे म्हणाले, मतदारसंघात होऊ घातलेल्या मोठे प्रकल्प विमानतळ , आयुष्य इस्पितळ तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि इतर प्रकल्प या सारख्या प्रकल्पांना मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असून ते पाणी देण्याकडे सरकारने अजूनही कोणत्याही प्रकारची पावले उचलली नाही. भविष्यात पेडणे येथील जनतेला पाण्यापासून वंचित राहावे लागणार असून सरकारने मोठे प्रकल्प जरूर आणावे मात्र ते आणण्यापूर्वी त्या प्रकल्पासाठी कोणते पाणी देण्याचीही तरतूद आणि प्रयोजन करावे असे भरत बागकर म्हणाले.
मोप लिंक रस्ता यासाठी आम्ही आंदोलन केलं .लोकांच्या जमिनी सरकारने हडप केल्या जबरदस्तीने लोकावर केसेस घातले मात्र अजून हा लढा संपलेला नाही. लोकांच्या उदेकाला मुख्यमंत्री यांनी आता आणखी वाढू नये तर त्यांच्या मागण्या पीडित शेतकऱयांच्या आणि मोफत पीडितांच्या आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्या अशी मागणी भारत बागकर यांनी केली.
आमच्या समितीची लवकरच बैठक होणार असून 15 रोजी या विमानतळावर पहिला उड्डान होणार आहे त्यासाठी समितीची बैठक घेऊन कशाप्रकारे निदर्शने याबाबत केली जाणार याचाही निर्णय समिती लवकरच घेणार असल्याचे यावेळी भास्कर नारूलकर यांनी सांगितले.
ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांची दुःख त्यांना माहित आहे. मोपा हा वरदान ठरला पाहिजे होते मात्र तो आता शाप ठरत असल्याचेही जितेंद्र गावकर म्हणाले. सरकार गोड बंगाल करून लोकांच्या जमिनी भूसंपादन करत आहेत. तसेच नोकरी संबंधात जो डाटा कंपनीकडे आहे तो मुख्यमंत्री यांनी घ्यावा .अधिकारी जे आहेत दिशाभूल करत असून प्रत्येक वेळी वेगवेगळे विधाने करुन पेडणेकर यांची दिशाभूल करण्याचे काम करु नये असेही जितेंद्र गावकर म्हणाले.