कोवीड मार्गदर्शन तत्वाचे पालन करावे. 15 दिवस देखरेख ठेऊन नंतर निर्णय घेणार.
डिचोली/प्रतिनिधी
राज्यातील शैक्षणिक वर्षांला आज सोमवारपासून सुरूवात होत असून सध्या राज्यात वाढत असलेल्या कोवीड संसंर्गाच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस परिस्थितीवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर गरज भासल्यासच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कोवीड बाबत पालक शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनीही पूर्ण खबरदारी घेताना कोवीड मार्गदर्शन तत्वा?चे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केले. दरम्यान आजपासून राज्यात शालेय वर्षाला प्रारंभ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी दहा पंधरा दिवसांत एकूणच स्थितीचा आढावा घेऊन या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरवळे येथील सुभाषचंद्र बोस उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यातील पर्यावरण संतुलन ठेवणे ही प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही रोजच जागतिक पर्यावरण दिन साजरा कारण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. हवामान बदलाचे परिणाम जगात अनेक ठिकाणी भेडसावत असून वृक्षारोपण व अन्य मार्गाने आम्हीं प्रत्येकाने गोव्याचा निसर्ग जपणे यासाठी विशेष योगदान देण्याची गरज आहे. मला काय त्याचे ? ही वृत्ती सोडून नैतिक जबाबदारीचे भान ठेवून वागलो तर निश्चितपणे हवामान बदलाच्या गंभीर परिणामातून काहीसा मार्ग काढू शकतो. असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
हवामान बदलाचे गंभीर परीणाम जाणवत आहेत. निसर्गाचे संतुलन बिघडण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. त्याचा अभ्यास चालूच आहे, गोवा राज्यातील पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी केले.
पावसापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी व सर्व ती खबरदारी उपाययोजना करण्याबाबत आदेश देण्यात आलेले असून काम सूरु असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.