ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर २० जून रोजी राज्यातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होत आहे. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नुकतंच भाजपने आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली, त्यानंतर आता काँग्रेसनेही (Congress) आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
काँग्रेसने विधान परिषदेसाठी (legislative council) दोन नावांची घोषणा केली आहे. भाई जगताप (bhai jagtap) आणि चंद्रकांत हंडोरे (chandrakant handore) यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन सकपाळ, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावांचीही चर्चा होती. मात्र आता दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. सोनिया गांधी (soniya gandhi) यांनी या दोन नावांवर सहमती दर्शवल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस मुकील वासनिक यांनी दिली आहे.
मागच्या निवडणुकीच्या वेळी प्रसाद लाड यांना भाई जगताप यांनी टक्कर दिली होती. अशात यावेळी जेव्हा भाई जगताप यांना काँग्रेसने पुन्हा संधी दिली आहे. भाजपने विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजेंना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे.