भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये पाच ट्वेंटी -ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरु आहे. त्यातील चौथा सामना आज राजकोट इथल्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सात वाजता सुरुवात होईल.
आतापर्यंत झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेनं २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाला आणखी एक विजय मिळवणं आवश्यक आहे. भारताने पहिले दोन सामने गमावले. त्यांनतर विशाखापट्टणम इथं मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात जोरदार पुनरागमन केलं.
येत्या रविवारी बेंगळुरू इथं पाचवा आणि शेवटच्या टी-२० सामना होणार आहे.